शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

समाजात कधी मिळणार आम्हाला समान हक्क? महिला वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 02:55 IST

विवाहबाह्य संबंधांसाठी स्त्री व पुरुष दोघांनाही जबाबदार धरण्यात यावे व त्यांना शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी करणारी याचिके सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. केंद्र सरकारने त्यास विरोध दर्शवला आहे.

पुणे : विवाहबाह्य संबंधांसाठी स्त्री व पुरुष दोघांनाही जबाबदार धरण्यात यावे व त्यांना शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी करणारी याचिके सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. केंद्र सरकारने त्यास विरोध दर्शवला आहे. सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार विवाहबाह्य संबंधांच्या संदर्भात केवळ पुरुषाला शिक्षेची तरतूद आहे. तर याचिका मान्य केल्यास विवाह संस्थेचे पावित्र्य नष्ट होण्याचा धोका उत्पन्न होण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे.आजही महिलेला केवळ उपभोगाची वस्तू मानले जात आहे. कायद्यात समानतेची मागणी करण्यात येत असली तरी सामाजिक समानता आहे का, याचादेखील विचार व्हावा, अशी भावना या प्रकरणी पुण्यातील महिला वकिलांनी व्यक्त केली आहे.महिलेचे विवाहबाह्य संबंध तिच्या घरी समजले तर त्यांच्यात वाद होतात. त्यातून ते अगदी घटस्फोटापर्यंत जात असतात. त्यामुळे अशा संबंधांतून महिलेची फरपट होत नाही, असे नाही. तिलादेखील भोगावे लागते. विवाहबाह्य संबंध मान्य करण्याचे प्रमाण आपल्याकडे खूपच कमी आहे. आपली संस्कृती त्याला मान्यता देत नाही.- अ‍ॅड. प्रगती पाटील, उपाध्यक्षा,पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनबलात्कार पीडित महिलेला एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपीपेक्षाही जास्त रोष सोसावा लागतो. आजही समाजात महिलेला मानाचे स्थान नसून तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. गुन्ह्यात नाहीत तर समाजात समाज महिलेला समान दर्जा द्यावा. या याचिकेनुसार महिलांवर देखील गुन्हा दाखल झाल्यास तिचे जगणे मुश्कील होऊन जाईल. त्यामुळे ही याचिका चुकीची आहे.- अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा,दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनविवाहसंस्था टिकणे ही महिलेची देखील जबाबदारी आहे. त्याची काळजीत्या घेतात. पण पतीच्यासंमतीने स्थापन केलेले संबंधवैध व संमती नसतानाचे संबंध अवैध हे योग्य आहे का़, विवाहबाह्य संबंध स्थापन करून महिलेने पुरुषाची फसवणूक केली, असे प्रकारदेखील वाढत आहेत.त्यामुळे या प्रकरात महिलेलादेखील आरोपी केले पाहिजे. जीवनशैली बदलतेय, मात्र त्यात विवाहसंस्था टिकताहेत का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी,उपाध्यक्षा, फॅमिली कोर्टअ‍ॅडव्होकेट असोसिएशनस्त्रियांवर अत्याचार होण्याचा आलेख सध्या उंचावतच आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा करण्याची ही योग्य वेळ नाही. आपला देश अजून तेवढा प्रगल्भ झालेला नाही किंवा आपली मानसिकतादेखील तशी नाही. स्त्री कितीही सक्षम असली तरी तिला इतर ठिकाणी समान हक्क मिळत नाही. याचिका मान्य झाल्यास अनेक कुटुंब तुटतील. कारण विवाहबाह्य संबंध कोणत्या कारणातून केले याचादेखील विचार व्हावा. तसेच ४९५ कलमानुसार दाखल झालेले गुन्हे सिद्ध करणे अवघड असतात. - अ‍ॅड. माधवी परदेशी

टॅग्स :WomenमहिलाPuneपुणे