शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Indrayani River: नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार?

By विश्वास मोरे | Updated: July 11, 2023 12:21 IST

इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे...

पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीला पावित्र्य आहे. ज्ञानोबा-तुकोबांमुळे इंद्रायणीला भक्तितीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. तर तुळापूर येथील संगमावर भीमा-इंद्रायणी संगमावर छत्रपती शंभूराजेंची समाधी आहे. त्यामुळे कुरवंडे या उगमापासून ते तुळापूर भीमा संगमापर्यंत भक्ती आणि शक्तीचे सिंचन नदीवर झाले. मात्र, मानवी हस्तक्षेप आणि नागरीकरण, वसाहती वाढल्याने नदी प्रदूषणात भर पडत आहे. गावे, नगरपालिका आणि महापालिकांच्या दुर्लक्षाने तीर्थरूपी इंद्रायणी गटारगंगा होत आहे. जीवनदान देणारे तीर्थ विष होत आहे. इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी इंद्रायणी ही महत्त्वाची नदी आहे. त्या नदीने महाराष्ट्राला संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज हे दोन संत दिले. विश्वात्मकतेचा प्रवाह येथूनच सुरू झाला. तो पूर्ण विश्वात शेकडो वर्षे वाहत आहे. मावळातील कुरवंडेगावातून सुरू होणारी इंद्रायणी नदी ही पिंपरी-चिंचवड शहरातून थेट तुळापूर येथील भीमा नदीस मिळते. नदी उगम ते संगमादरम्यानच्या गावांमध्ये होणारे नदी प्रदूषण वाढतच आहे. नदीचा हा प्रवाह सुमारे १०३ किलोमीटरचा आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातून ही नदी एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे.

गावांचे सांडपाणी थेट नदीत

इंद्रायणी नदीची पाहणी केली असता उगमापासूनपर्यंत सुरुवातीस लोणावळा आणि भांगरवाडी परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. बहुतांश नाले थेटपणे नदीत सोडले आहेत तसेच पुढे वलवण भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. मळवळी, कामशेत, कान्हे, टाकवे, कातवी, तळेगाव दाभाडे, आंबी, इंदोरी, शेलारवाडी, कान्हेवाडी, किन्हई, देहूगाव, येलवाडी, खालुंब्रे, निघोजे, तळवडे, चिखली, मोई, मोशी, चऱ्होली, आळंदी, धानोरे, वडगाव शिंदे, मरकळ तुळापूर भागातील नैसर्गिक नाले हे थेटपणे नदीत सोडले आहेत.

एसटीपी प्लॉट नावालाच

लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूगाव, आळंदी अशा चार नगरपालिका, पिंपरी-चिंचवड ही महापालिका क्षेत्र आहे. मात्र, गावठाणांच्या भागात प्रक्रिया न करताच पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच महापालिका आणि नगरपालिकांनी सुरू केलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे दिसून येत आहेत. नैसर्गिक नाल्यांतील पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच काही गावांतील यंत्रणा बंद पडली आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड