शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

Indrayani River: नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार?

By विश्वास मोरे | Updated: July 11, 2023 12:21 IST

इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे...

पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीला पावित्र्य आहे. ज्ञानोबा-तुकोबांमुळे इंद्रायणीला भक्तितीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. तर तुळापूर येथील संगमावर भीमा-इंद्रायणी संगमावर छत्रपती शंभूराजेंची समाधी आहे. त्यामुळे कुरवंडे या उगमापासून ते तुळापूर भीमा संगमापर्यंत भक्ती आणि शक्तीचे सिंचन नदीवर झाले. मात्र, मानवी हस्तक्षेप आणि नागरीकरण, वसाहती वाढल्याने नदी प्रदूषणात भर पडत आहे. गावे, नगरपालिका आणि महापालिकांच्या दुर्लक्षाने तीर्थरूपी इंद्रायणी गटारगंगा होत आहे. जीवनदान देणारे तीर्थ विष होत आहे. इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी इंद्रायणी ही महत्त्वाची नदी आहे. त्या नदीने महाराष्ट्राला संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज हे दोन संत दिले. विश्वात्मकतेचा प्रवाह येथूनच सुरू झाला. तो पूर्ण विश्वात शेकडो वर्षे वाहत आहे. मावळातील कुरवंडेगावातून सुरू होणारी इंद्रायणी नदी ही पिंपरी-चिंचवड शहरातून थेट तुळापूर येथील भीमा नदीस मिळते. नदी उगम ते संगमादरम्यानच्या गावांमध्ये होणारे नदी प्रदूषण वाढतच आहे. नदीचा हा प्रवाह सुमारे १०३ किलोमीटरचा आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातून ही नदी एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे.

गावांचे सांडपाणी थेट नदीत

इंद्रायणी नदीची पाहणी केली असता उगमापासूनपर्यंत सुरुवातीस लोणावळा आणि भांगरवाडी परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. बहुतांश नाले थेटपणे नदीत सोडले आहेत तसेच पुढे वलवण भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. मळवळी, कामशेत, कान्हे, टाकवे, कातवी, तळेगाव दाभाडे, आंबी, इंदोरी, शेलारवाडी, कान्हेवाडी, किन्हई, देहूगाव, येलवाडी, खालुंब्रे, निघोजे, तळवडे, चिखली, मोई, मोशी, चऱ्होली, आळंदी, धानोरे, वडगाव शिंदे, मरकळ तुळापूर भागातील नैसर्गिक नाले हे थेटपणे नदीत सोडले आहेत.

एसटीपी प्लॉट नावालाच

लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूगाव, आळंदी अशा चार नगरपालिका, पिंपरी-चिंचवड ही महापालिका क्षेत्र आहे. मात्र, गावठाणांच्या भागात प्रक्रिया न करताच पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच महापालिका आणि नगरपालिकांनी सुरू केलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे दिसून येत आहेत. नैसर्गिक नाल्यांतील पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच काही गावांतील यंत्रणा बंद पडली आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड