शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Indrayani River: नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार?

By विश्वास मोरे | Updated: July 11, 2023 12:21 IST

इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे...

पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीला पावित्र्य आहे. ज्ञानोबा-तुकोबांमुळे इंद्रायणीला भक्तितीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. तर तुळापूर येथील संगमावर भीमा-इंद्रायणी संगमावर छत्रपती शंभूराजेंची समाधी आहे. त्यामुळे कुरवंडे या उगमापासून ते तुळापूर भीमा संगमापर्यंत भक्ती आणि शक्तीचे सिंचन नदीवर झाले. मात्र, मानवी हस्तक्षेप आणि नागरीकरण, वसाहती वाढल्याने नदी प्रदूषणात भर पडत आहे. गावे, नगरपालिका आणि महापालिकांच्या दुर्लक्षाने तीर्थरूपी इंद्रायणी गटारगंगा होत आहे. जीवनदान देणारे तीर्थ विष होत आहे. इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी इंद्रायणी ही महत्त्वाची नदी आहे. त्या नदीने महाराष्ट्राला संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज हे दोन संत दिले. विश्वात्मकतेचा प्रवाह येथूनच सुरू झाला. तो पूर्ण विश्वात शेकडो वर्षे वाहत आहे. मावळातील कुरवंडेगावातून सुरू होणारी इंद्रायणी नदी ही पिंपरी-चिंचवड शहरातून थेट तुळापूर येथील भीमा नदीस मिळते. नदी उगम ते संगमादरम्यानच्या गावांमध्ये होणारे नदी प्रदूषण वाढतच आहे. नदीचा हा प्रवाह सुमारे १०३ किलोमीटरचा आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातून ही नदी एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे.

गावांचे सांडपाणी थेट नदीत

इंद्रायणी नदीची पाहणी केली असता उगमापासूनपर्यंत सुरुवातीस लोणावळा आणि भांगरवाडी परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. बहुतांश नाले थेटपणे नदीत सोडले आहेत तसेच पुढे वलवण भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. मळवळी, कामशेत, कान्हे, टाकवे, कातवी, तळेगाव दाभाडे, आंबी, इंदोरी, शेलारवाडी, कान्हेवाडी, किन्हई, देहूगाव, येलवाडी, खालुंब्रे, निघोजे, तळवडे, चिखली, मोई, मोशी, चऱ्होली, आळंदी, धानोरे, वडगाव शिंदे, मरकळ तुळापूर भागातील नैसर्गिक नाले हे थेटपणे नदीत सोडले आहेत.

एसटीपी प्लॉट नावालाच

लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूगाव, आळंदी अशा चार नगरपालिका, पिंपरी-चिंचवड ही महापालिका क्षेत्र आहे. मात्र, गावठाणांच्या भागात प्रक्रिया न करताच पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच महापालिका आणि नगरपालिकांनी सुरू केलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे दिसून येत आहेत. नैसर्गिक नाल्यांतील पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच काही गावांतील यंत्रणा बंद पडली आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड