शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांची मालिका थांबणार तरी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:55 IST

कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे...

लोणावळा (पुणे) :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांची ही मालिका थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाट परिसरात दैनंदिन अपघात सुरू आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये या मार्गावर हजारो अपघात होऊन असंख्य नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जायबंद झाले. या एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे.

राज्यातील कोणातरी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर येथे यंत्रणांना जाग येते. चौकशांच्या फेऱ्या सुरू होतात व पुढे काहीच होत नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे हा ९४ किलोमीटर अंतराचा एक्स्प्रेस-वे आहे. कळंबोली ते किवळे असा हा मार्ग असून, या जलदगती मार्गामुळे मुंबई व पुणे ही दोन्ही राजधानींची शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत, नागरिकांचा वेळ वाचावा व वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, यासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही झाले नसून एक्स्प्रेस-वे हा सततच्या वाहतूककोंडीमुळे कासवगती झाला आहे. सततचे अपघात यामुळे एक्स्प्रेस-वे हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या

एक्स्प्रेस-वेवरील अपघातांना वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काही वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. उर्से व खालापूर टोलनाका या ठिकाणी वाहन चालकांची जागृती करण्यात आली. मात्र, तरीदेखील वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याने ‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या बनली आहे.

टॅग्स :AccidentअपघातlonavalaलोणावळाMumbaiमुंबई