शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांची मालिका थांबणार तरी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:55 IST

कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे...

लोणावळा (पुणे) :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांची ही मालिका थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाट परिसरात दैनंदिन अपघात सुरू आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये या मार्गावर हजारो अपघात होऊन असंख्य नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जायबंद झाले. या एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे.

राज्यातील कोणातरी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर येथे यंत्रणांना जाग येते. चौकशांच्या फेऱ्या सुरू होतात व पुढे काहीच होत नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे हा ९४ किलोमीटर अंतराचा एक्स्प्रेस-वे आहे. कळंबोली ते किवळे असा हा मार्ग असून, या जलदगती मार्गामुळे मुंबई व पुणे ही दोन्ही राजधानींची शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत, नागरिकांचा वेळ वाचावा व वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, यासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही झाले नसून एक्स्प्रेस-वे हा सततच्या वाहतूककोंडीमुळे कासवगती झाला आहे. सततचे अपघात यामुळे एक्स्प्रेस-वे हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या

एक्स्प्रेस-वेवरील अपघातांना वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काही वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. उर्से व खालापूर टोलनाका या ठिकाणी वाहन चालकांची जागृती करण्यात आली. मात्र, तरीदेखील वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याने ‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या बनली आहे.

टॅग्स :AccidentअपघातlonavalaलोणावळाMumbaiमुंबई