शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय अंमल येणार कधी ?

By admin | Updated: September 7, 2016 01:30 IST

हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. पालकमंत्र्यांकडून अद्यापही नावे न आल्याने नियुक्तीबद्दल ठाम काही सांगता येणार नसल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे शशिकांत घोरपडे यांनी दिली.‘यशवंत’बाबत २२ आॅगस्ट रोजी सहकार व पालकमंत्री यांची बैठक झाली. या वेळी प्रधान सचिव, सहसचिव, राज्य सहकारी बँकेचे पदाधिकारी यांचेसमवेत संचालक (साखर) किशोर तोष्णीवाल, यशवंतचे प्रशासक सुरेश जरे हे उपस्थित होते. यशवंत लवकरात लवकर चालू करण्यावर मार्ग काढण्यासमवेत हा विषय घेण्यात आला होता.बापट यांनी प्रशासक मंडळाच्या सदस्यांची नावे घोरपडे यांचेकडे द्यायची, असे ठरले होते. ती नावे आजअखेर न आल्याने यशवंतचे प्रशासकीय मंडळ कधी नेमणार ? असा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे.यातून मार्ग काढून कारखाना पुन्हा पूर्ववैभवाने चालू व्हावा, याकरिता कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे किंवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या रकमेसाठी आवश्यक तेवढ्या जमिनीची लिलाव पद्धतीने विक्री करणे हे दोन पर्याय पुढे आले.परंतु चालवायला कोणीही पुढे आले नाही. लिलाव करण्याच्या प्रयत्नांना तीन वेळा यश आले नाही. नगदी व हमखास पैसा मिळवून देणारे पीक असल्याने आजही पूर्व हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात असून, या पिकाचे क्षेत्रही या भागात जोरदार आहे.परंतु, गेल्या चार वर्षांत यशवंतची झालेली दुरवस्था व उसाचे कोसळलेले दर या दुहेरी कात्रीत येथील शेतकरी अडकला असून, आपल्या शेतातील ऊस गाळपास घालवण्यासाठी त्याला साखरसम्राटांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. केवळ यशवंत बंद झाल्याने त्याचेवर ही वेळ आलेली असून, त्यामुळे आपल्या हक्काचा कारखाना केव्हा सुरू होणार ? हा सवाल त्याला वारंवार सतावत आहे.राज्य सहकारी बँकेने जमीनविक्री केली असती, तर सर्व बोजा उतरून यशवंत पूर्ववैभवांत पुन्हा चालू झाला असता. परंतु विक्रीबाबत बँकेस अपयश आल्याने हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. फेब्रुवारी/ मार्चमध्ये आसवणी प्रकल्प सुरू करून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पैश्याच्या अनुपलब्धतेमुळे तोही बारगळला. प्रशासकीय मंडळाची स्थापना झाली, तर पैशाच्या उपलब्धतेबाबत नवनवे प्रस्ताव समोर येतील,