शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय अंमल येणार कधी ?

By admin | Updated: September 7, 2016 01:30 IST

हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. पालकमंत्र्यांकडून अद्यापही नावे न आल्याने नियुक्तीबद्दल ठाम काही सांगता येणार नसल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे शशिकांत घोरपडे यांनी दिली.‘यशवंत’बाबत २२ आॅगस्ट रोजी सहकार व पालकमंत्री यांची बैठक झाली. या वेळी प्रधान सचिव, सहसचिव, राज्य सहकारी बँकेचे पदाधिकारी यांचेसमवेत संचालक (साखर) किशोर तोष्णीवाल, यशवंतचे प्रशासक सुरेश जरे हे उपस्थित होते. यशवंत लवकरात लवकर चालू करण्यावर मार्ग काढण्यासमवेत हा विषय घेण्यात आला होता.बापट यांनी प्रशासक मंडळाच्या सदस्यांची नावे घोरपडे यांचेकडे द्यायची, असे ठरले होते. ती नावे आजअखेर न आल्याने यशवंतचे प्रशासकीय मंडळ कधी नेमणार ? असा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे.यातून मार्ग काढून कारखाना पुन्हा पूर्ववैभवाने चालू व्हावा, याकरिता कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे किंवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या रकमेसाठी आवश्यक तेवढ्या जमिनीची लिलाव पद्धतीने विक्री करणे हे दोन पर्याय पुढे आले.परंतु चालवायला कोणीही पुढे आले नाही. लिलाव करण्याच्या प्रयत्नांना तीन वेळा यश आले नाही. नगदी व हमखास पैसा मिळवून देणारे पीक असल्याने आजही पूर्व हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात असून, या पिकाचे क्षेत्रही या भागात जोरदार आहे.परंतु, गेल्या चार वर्षांत यशवंतची झालेली दुरवस्था व उसाचे कोसळलेले दर या दुहेरी कात्रीत येथील शेतकरी अडकला असून, आपल्या शेतातील ऊस गाळपास घालवण्यासाठी त्याला साखरसम्राटांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. केवळ यशवंत बंद झाल्याने त्याचेवर ही वेळ आलेली असून, त्यामुळे आपल्या हक्काचा कारखाना केव्हा सुरू होणार ? हा सवाल त्याला वारंवार सतावत आहे.राज्य सहकारी बँकेने जमीनविक्री केली असती, तर सर्व बोजा उतरून यशवंत पूर्ववैभवांत पुन्हा चालू झाला असता. परंतु विक्रीबाबत बँकेस अपयश आल्याने हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. फेब्रुवारी/ मार्चमध्ये आसवणी प्रकल्प सुरू करून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पैश्याच्या अनुपलब्धतेमुळे तोही बारगळला. प्रशासकीय मंडळाची स्थापना झाली, तर पैशाच्या उपलब्धतेबाबत नवनवे प्रस्ताव समोर येतील,