शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गांधीजींच्या शस्त्रक्रियेत लाईट गेली तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:25 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया.

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया जरी लहान असली तरी त्यात अचानक लाईट गेल्याने गोंधळ उडाला होता. या प्रसंगाला आता 94 वर्ष पूर्ण झाली आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत लाखो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यामध्ये खुद्द गांधीजींचाही समावेश आहे.गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 मार्च 1922 अहमदाबाद न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले. येरवड्यात 22 महिने पूर्ण झाल्यावर त्यांना पोटाच्या आतड्यात (ऍपेंडिक्स) वेदना होण्यास सुरुवात झाली. अखेर 12 जानेवारी 1924च्या रात्री त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातही अचानक वीज खंडित झाली होती. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ससूनच्या जुन्या दगडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयाच्या वतीने ऑपरेशन झाले त्या ठिकाणी छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. गांधीजींवर शस्त्रक्रिया करतानाची सामुग्री जपून ठेवण्यात आली. इतर वेळी हे स्मारक सर्वांसाठी खुले नसले तरी त्यांच्या जयंतीनिमित्त सामान्यांकरिता खुले करण्यात येते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी