शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

काय आहे जादू ! कोरोनाच्या महामारीत पण 'बारामती' ची भेंडी युरोपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 18:59 IST

स्थानिक बाजारपेठेपेक्षा या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दुप्पटीने दर मिळाला

ठळक मुद्देबारामतीच्या शेतकऱ्यांनी साधली मंदीत संधी

बारामती : जगभरात कोरोेना पसरल्यामुळे सर्वच उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे.सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नसल्याचे चित्र आहे. मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी मंदीत संधी साधली आहे.कोरोनामुळे येथील स्थानिक बाजारपेठ अडचणीत आली. अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका असून देखील घरोघरी जाऊन कलिंगड, खरबूज, चिकू सारख्या फळांसह भाजीपाला विकावा लागला. मात्र, मागणी अभावी कवडीमोल दरात ही शेती उत्पादने विकावी लागल्याचे वास्तव आहे. त्यातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बारामती येथील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अपवाद ठरली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात सर्वत्र निर्यात बंद आहे. मागणी असल्याने निर्यात बंद करण्याची वेळ आली. मात्र, केवळ दर्जेदार आणि विषमुक्त उत्पादनामुळे या शेतकऱ्यांच्या कंपनीने संकटाच्या काळात संधी साधण्यास यश मिळविले आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पटीने या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दर मिळाला आहे. तालुक्यातील मळद आणि निरावागज येथील शेतकऱ्यांनी करार पद्धतीने २० एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे.मात्र, लॉकडाऊनमुळे या भेंडीची निर्यात अडचणीची ठरली होती. आतापर्यंत दीडटन भेंडीची निर्यात करण्यास यश आल्याचे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. 

 कृषी विज्ञान केंद्र चे भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती फार्मर्स प्रोडूसर कंपनी ली, बारामती. गोग्रीन एक्सपोर्ट कंपनी यांचे वतीने विषमुक्त (सेंद्रिय) करार शेती या अंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाला यश आले आहे.  येथील भेंडी तोडणीला आल्यावर कोरोनाचा प्रकोप वाढत चालला,यामुळे शेतकरी हतबल झाले होते. परंतु अशाही कठीण परिस्थितीत माल युरोपला पााठविण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे ,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीरअली यांच्यासह येथील कृषि विज्ञान केंद्र टीम कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भेंडी उत्पादक शेतकरी प्रल्हाद वरे, अविनाश देवकाते, कपिल देवकाते, मधुकर देवकाते, डाळ, अमोल देवकाते व ढेकाणे व इतर शेतकऱ्यांची विषमुक्त भेंडीची पहिली ऑर्डर युरोपला रवानाझाली.त्यासाठी भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे यशवंत जगदाळे , तुषार जाधव व गिरीधर खरात यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना महत्वाचे ठरले.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीLondonलंडन