शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

काय आहे जादू ! कोरोनाच्या महामारीत पण 'बारामती' ची भेंडी युरोपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 18:59 IST

स्थानिक बाजारपेठेपेक्षा या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दुप्पटीने दर मिळाला

ठळक मुद्देबारामतीच्या शेतकऱ्यांनी साधली मंदीत संधी

बारामती : जगभरात कोरोेना पसरल्यामुळे सर्वच उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे.सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नसल्याचे चित्र आहे. मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी मंदीत संधी साधली आहे.कोरोनामुळे येथील स्थानिक बाजारपेठ अडचणीत आली. अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका असून देखील घरोघरी जाऊन कलिंगड, खरबूज, चिकू सारख्या फळांसह भाजीपाला विकावा लागला. मात्र, मागणी अभावी कवडीमोल दरात ही शेती उत्पादने विकावी लागल्याचे वास्तव आहे. त्यातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बारामती येथील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अपवाद ठरली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात सर्वत्र निर्यात बंद आहे. मागणी असल्याने निर्यात बंद करण्याची वेळ आली. मात्र, केवळ दर्जेदार आणि विषमुक्त उत्पादनामुळे या शेतकऱ्यांच्या कंपनीने संकटाच्या काळात संधी साधण्यास यश मिळविले आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पटीने या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दर मिळाला आहे. तालुक्यातील मळद आणि निरावागज येथील शेतकऱ्यांनी करार पद्धतीने २० एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे.मात्र, लॉकडाऊनमुळे या भेंडीची निर्यात अडचणीची ठरली होती. आतापर्यंत दीडटन भेंडीची निर्यात करण्यास यश आल्याचे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. 

 कृषी विज्ञान केंद्र चे भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती फार्मर्स प्रोडूसर कंपनी ली, बारामती. गोग्रीन एक्सपोर्ट कंपनी यांचे वतीने विषमुक्त (सेंद्रिय) करार शेती या अंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाला यश आले आहे.  येथील भेंडी तोडणीला आल्यावर कोरोनाचा प्रकोप वाढत चालला,यामुळे शेतकरी हतबल झाले होते. परंतु अशाही कठीण परिस्थितीत माल युरोपला पााठविण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे ,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीरअली यांच्यासह येथील कृषि विज्ञान केंद्र टीम कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भेंडी उत्पादक शेतकरी प्रल्हाद वरे, अविनाश देवकाते, कपिल देवकाते, मधुकर देवकाते, डाळ, अमोल देवकाते व ढेकाणे व इतर शेतकऱ्यांची विषमुक्त भेंडीची पहिली ऑर्डर युरोपला रवानाझाली.त्यासाठी भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे यशवंत जगदाळे , तुषार जाधव व गिरीधर खरात यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना महत्वाचे ठरले.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीLondonलंडन