शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शेतकऱ्यांना पैसे कशाचे? विमा कंपन्यांचा आक्षेप; शेतकऱ्यांना मिळणारी मदत अडकली, दिवाळी अशीच जाण्याची चिन्हे

By नितीन चौधरी | Updated: October 13, 2023 10:30 IST

जिल्हानिहाय राज्याची स्थिती अशी...

पुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतील निकषांनुसार २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम देण्याच्या २४ पैकी २० अधिसूचनांवर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अशीच मदतीविना जाण्याची चिन्हे आहेत.  

याबाबत राज्यातील २४ जिल्ह्यांनी अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार एक महिन्याच्या आत ही रक्कम विमा कंपन्यांनी द्यावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, कंपन्यांनी २० अधिसूचनांवर आक्षेप घेतला. यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनावणी घेणार आहेत. यात विमा कंपन्यांचे समाधान न झाल्यास त्यांना कृषी सचिव व त्यानंतर केंद्र सरकारकडे दाद मागण्याची मुभा आहे. 

आक्षेप कशावर?- जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत खंड पडलेल्या महसूल मंडळांची संख्या दर्शविण्यात आली होती. - मात्र, विमा कंपन्यांनी याच महसूल मंडळांच्या संख्येवर आक्षेप घेतला. - संभाव्य उत्पादनात येणार असलेली घट यावरही कंपन्यांनी आक्षेप घेत २० जिल्ह्यांमधील अधिसूचनेवर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहेत. 

२४ जिल्ह्यांमध्ये १२ दिवसांपेक्षा अधिक खंड राज्यात ऑगस्ट महिन्यात २४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड हा १२ दिवसांपेक्षा अधिक कालावधिसाठी  राहिला. खरीप पीकविमा योजनेतील निकषांनुसार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत २४ जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली होती.  

जिल्हानिहाय राज्याची स्थिती अधिसूचना जारी केलेले जिल्हे : नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, कोल्हापूर, नांदेड, परभणी, नागपूर. अधिसूचनेवर आक्षेप नसलेले जिल्हे : कोल्हापूर, परभणी, नांदेड, नागपूर.

सुनावणी झालेले जिल्हे : बीड, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम. या जिल्ह्यांमधील अधिसूचनेवर संबंधित विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल कृषी सचिव व आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDiwaliदिवाळी 2022Governmentसरकार