शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 19:12 IST

पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे

पुणे : पुण्याबददल मला कायमच आकर्षण राहिलं आहे. पुण्याशी माझं नातं देखील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले, माझे आजोळही अगदी सदाशिव पेठेत होते. त्यामुळे आमच्या ‘डायनिंग टेबल’ वर पुण्याबद्दलच चर्चा व्हायची. मात्र, मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखविली. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उदय लळीत म्हणाले, पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीशी माझा दुरून संबंध आला होता. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तरुणपणी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणा-या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी वकिलांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

''पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनचा अमृत महोत्सव हा ’दुग्धशर्करा योग’ आहे, असे नमूद करत उदय लळीत वकिली व्यवसायाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणा-या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ’विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.''

घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे

लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. लोकशाहीसाठी आवश्यक या तत्त्वांची सदैव जपणूक करण्याची जबाबदारी वकिलांची आहे. - उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलcultureसांस्कृतिकartकला