शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 19:12 IST

पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे

पुणे : पुण्याबददल मला कायमच आकर्षण राहिलं आहे. पुण्याशी माझं नातं देखील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले, माझे आजोळही अगदी सदाशिव पेठेत होते. त्यामुळे आमच्या ‘डायनिंग टेबल’ वर पुण्याबद्दलच चर्चा व्हायची. मात्र, मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखविली. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उदय लळीत म्हणाले, पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीशी माझा दुरून संबंध आला होता. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तरुणपणी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणा-या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी वकिलांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

''पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनचा अमृत महोत्सव हा ’दुग्धशर्करा योग’ आहे, असे नमूद करत उदय लळीत वकिली व्यवसायाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणा-या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ’विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.''

घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे

लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. लोकशाहीसाठी आवश्यक या तत्त्वांची सदैव जपणूक करण्याची जबाबदारी वकिलांची आहे. - उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलcultureसांस्कृतिकartकला