शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 19:12 IST

पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे

पुणे : पुण्याबददल मला कायमच आकर्षण राहिलं आहे. पुण्याशी माझं नातं देखील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले, माझे आजोळही अगदी सदाशिव पेठेत होते. त्यामुळे आमच्या ‘डायनिंग टेबल’ वर पुण्याबद्दलच चर्चा व्हायची. मात्र, मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखविली. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उदय लळीत म्हणाले, पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीशी माझा दुरून संबंध आला होता. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तरुणपणी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणा-या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी वकिलांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

''पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनचा अमृत महोत्सव हा ’दुग्धशर्करा योग’ आहे, असे नमूद करत उदय लळीत वकिली व्यवसायाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणा-या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ’विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.''

घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे

लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. लोकशाहीसाठी आवश्यक या तत्त्वांची सदैव जपणूक करण्याची जबाबदारी वकिलांची आहे. - उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलcultureसांस्कृतिकartकला