शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 19:12 IST

पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे

पुणे : पुण्याबददल मला कायमच आकर्षण राहिलं आहे. पुण्याशी माझं नातं देखील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले, माझे आजोळही अगदी सदाशिव पेठेत होते. त्यामुळे आमच्या ‘डायनिंग टेबल’ वर पुण्याबद्दलच चर्चा व्हायची. मात्र, मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखविली. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उदय लळीत म्हणाले, पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीशी माझा दुरून संबंध आला होता. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तरुणपणी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणा-या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी वकिलांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

''पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनचा अमृत महोत्सव हा ’दुग्धशर्करा योग’ आहे, असे नमूद करत उदय लळीत वकिली व्यवसायाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणा-या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ’विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.''

घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे

लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. लोकशाहीसाठी आवश्यक या तत्त्वांची सदैव जपणूक करण्याची जबाबदारी वकिलांची आहे. - उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलcultureसांस्कृतिकartकला