शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोणत्या कारणांमुळे हॉटेल्रवर होते कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाकडून घ्या जाणून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:05 IST

पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे.

पुणे : हॉटेलमध्ये जायला सगळ्यांनाच आवडते. पण जिथे पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि स्वच्छ आणि योग्य दर्जा असलेल्या हॉटेल्समध्येच जा. याच हॉटेल आणि रेस्टोरन्टच्या दर्जावर लक्ष ठेवते ते अन्न  आणि औषध प्रशासन. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून अशा कारवाया सुरु असून अनेक नामवंत हॉटेल आणि रेस्टोरंटचा यात समावेश आहे. मात्र या कारवाईमागे नेमकी काय कारणे असतात जे लोकमतने अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. 

 

प्रश्न : हॉटेलवर कारवाईचे प्रमाण बघता त्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ?

उत्तर : लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर आम्ही कारवाई करतो. सर्वसाधारणपणे स्वच्छता, स्वयंपाकघरातील वातावरण, कामगारांचे आरोग्य, त्यांचे वेळेत केलेले लसीकरण, कच्च्या मालाची योग्य साठवणून या आणि अशा मुद्द्यांवर तपासणी केली जाते. दुसरा मुद्दा म्हणजे संबंधित व्यावसायिकांकडे परवाना आहे का, त्याचे नूतनीकरण केले आहे का याचीही पडताळणी होते. याशिवाय वापरण्यात येणारे दूध, पनीर किंवा तत्सम दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात ठेवले आहेत का हेदेखील बघितले जाते. 

 

प्रश्न : ग्राहकाने कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे?

उत्तर : हा मुद्दा सर्वांत महत्वाचा आहे. जर ग्राहकाने स्वच्छतेची मागणी केली तर व्यावसायिक ते देणे गरजेचे असते. त्यामुळे ग्राहकाने जागरूक असणे महत्वाचे ठरते. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे कोणत्या ग्लासात पाणी दिले जाते, माशांचे प्रमाण किती आहे, स्वच्छता कशी आहे, वेटर किंवा वाढपी स्वच्छ आहे का, त्याचे हात, कपडे कसे आहेत याकडे ग्राहकांनी आवर्जून लक्ष द्यावे. गरज वाटल्यास त्याची मालकाला कल्पना देऊन बदलाची मागणी करावी आणि तसेही न झाल्यास आम्हाला टोल फ्री क्रमांकावर कळवावे. 

 

प्रश्न : कोणत्याही हॉटेलवर थेट कारवाई केली जाते का किंवा त्याची पद्धत काय आहे ?

उत्तर : दोन प्रकारे कारवाई केली जाते. जर एखादे हॉटेल प्रचंड अस्वच्छ असेल तर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र एखादे हॉटेल काही नियम पाळत नसेल तर त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्यात सांगितल्यानुसार बदल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. त्यातही काही चुका आढळल्यास अजून काही कालावधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. मात्र तरीही व्यावसायिक योग्य कार्यवाही करत नसेल तर मात्र संबंधित व्यावसायिकाच्या हॉटेलवर कारवाई केली जाते. 

टॅग्स :FDAएफडीएfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfood poisoningअन्नातून विषबाधा