शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कारणांमुळे हॉटेल्रवर होते कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाकडून घ्या जाणून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:05 IST

पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे.

पुणे : हॉटेलमध्ये जायला सगळ्यांनाच आवडते. पण जिथे पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि स्वच्छ आणि योग्य दर्जा असलेल्या हॉटेल्समध्येच जा. याच हॉटेल आणि रेस्टोरन्टच्या दर्जावर लक्ष ठेवते ते अन्न  आणि औषध प्रशासन. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून अशा कारवाया सुरु असून अनेक नामवंत हॉटेल आणि रेस्टोरंटचा यात समावेश आहे. मात्र या कारवाईमागे नेमकी काय कारणे असतात जे लोकमतने अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. 

 

प्रश्न : हॉटेलवर कारवाईचे प्रमाण बघता त्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ?

उत्तर : लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर आम्ही कारवाई करतो. सर्वसाधारणपणे स्वच्छता, स्वयंपाकघरातील वातावरण, कामगारांचे आरोग्य, त्यांचे वेळेत केलेले लसीकरण, कच्च्या मालाची योग्य साठवणून या आणि अशा मुद्द्यांवर तपासणी केली जाते. दुसरा मुद्दा म्हणजे संबंधित व्यावसायिकांकडे परवाना आहे का, त्याचे नूतनीकरण केले आहे का याचीही पडताळणी होते. याशिवाय वापरण्यात येणारे दूध, पनीर किंवा तत्सम दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात ठेवले आहेत का हेदेखील बघितले जाते. 

 

प्रश्न : ग्राहकाने कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे?

उत्तर : हा मुद्दा सर्वांत महत्वाचा आहे. जर ग्राहकाने स्वच्छतेची मागणी केली तर व्यावसायिक ते देणे गरजेचे असते. त्यामुळे ग्राहकाने जागरूक असणे महत्वाचे ठरते. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे कोणत्या ग्लासात पाणी दिले जाते, माशांचे प्रमाण किती आहे, स्वच्छता कशी आहे, वेटर किंवा वाढपी स्वच्छ आहे का, त्याचे हात, कपडे कसे आहेत याकडे ग्राहकांनी आवर्जून लक्ष द्यावे. गरज वाटल्यास त्याची मालकाला कल्पना देऊन बदलाची मागणी करावी आणि तसेही न झाल्यास आम्हाला टोल फ्री क्रमांकावर कळवावे. 

 

प्रश्न : कोणत्याही हॉटेलवर थेट कारवाई केली जाते का किंवा त्याची पद्धत काय आहे ?

उत्तर : दोन प्रकारे कारवाई केली जाते. जर एखादे हॉटेल प्रचंड अस्वच्छ असेल तर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र एखादे हॉटेल काही नियम पाळत नसेल तर त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्यात सांगितल्यानुसार बदल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. त्यातही काही चुका आढळल्यास अजून काही कालावधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. मात्र तरीही व्यावसायिक योग्य कार्यवाही करत नसेल तर मात्र संबंधित व्यावसायिकाच्या हॉटेलवर कारवाई केली जाते. 

टॅग्स :FDAएफडीएfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfood poisoningअन्नातून विषबाधा