शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

वाळूउपशामुळे विहिरी तळात

By admin | Updated: May 11, 2015 06:20 IST

नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच

जेजुरी : नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच; मात्र त्याबरोबर गावातील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. शेत शिवाराचे आणि एकूणच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वेळा याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे काणाडोळा केला जात असून, स्थानिक प्रशासन तात्पुरती कार्यवाही करत आहे. मात्र वाळूउपसा एका वर्षापासून सुरू आहे. मागील वर्षी ओढा रुंदी व खोलीकरणाच्या नावाखाली हा वाळू उपसा सुरू केला. ओढ्याची खोली अगर रुंदी वाढ झाली नाहीच. मात्र ओढ्याचे विद्रूपीकरण झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे केल्याने ओढ्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. लगतच्या शेतजमिनी वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील माळवदकर मळा येथील या विहिरीची पाणीपातळी अगदी तळात गेली असून, कितीही दुष्काळ पडला तरीही या विहिरीची पाणीपातळी कधीही कमी झाली नव्हती. उलट आसपासच्या गावातील लोकही पाणी घेऊन जात असत, अशी माहिती जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीटओढ्याकाठच्या परिसरातील अनेक विहिरी त्याचप्रमाणे गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. मात्र, या विहीर परिसरात झालेल्या प्रचंड वाळूउपशामुळे यंदा एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अर्थपूर्ण सहकार्याचा ग्रामस्थांचा आरोप४नायगावच्या ओढ्यातून सध्या दररोज दोन ते चार ट्रक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. महसूल प्रशासनाकडे तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.