शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाळूउपशामुळे विहिरी तळात

By admin | Updated: May 11, 2015 06:20 IST

नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच

जेजुरी : नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच; मात्र त्याबरोबर गावातील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. शेत शिवाराचे आणि एकूणच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वेळा याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे काणाडोळा केला जात असून, स्थानिक प्रशासन तात्पुरती कार्यवाही करत आहे. मात्र वाळूउपसा एका वर्षापासून सुरू आहे. मागील वर्षी ओढा रुंदी व खोलीकरणाच्या नावाखाली हा वाळू उपसा सुरू केला. ओढ्याची खोली अगर रुंदी वाढ झाली नाहीच. मात्र ओढ्याचे विद्रूपीकरण झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे केल्याने ओढ्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. लगतच्या शेतजमिनी वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील माळवदकर मळा येथील या विहिरीची पाणीपातळी अगदी तळात गेली असून, कितीही दुष्काळ पडला तरीही या विहिरीची पाणीपातळी कधीही कमी झाली नव्हती. उलट आसपासच्या गावातील लोकही पाणी घेऊन जात असत, अशी माहिती जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीटओढ्याकाठच्या परिसरातील अनेक विहिरी त्याचप्रमाणे गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. मात्र, या विहीर परिसरात झालेल्या प्रचंड वाळूउपशामुळे यंदा एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अर्थपूर्ण सहकार्याचा ग्रामस्थांचा आरोप४नायगावच्या ओढ्यातून सध्या दररोज दोन ते चार ट्रक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. महसूल प्रशासनाकडे तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.