शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

वाळूउपशामुळे विहिरी तळात

By admin | Updated: May 11, 2015 06:20 IST

नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच

जेजुरी : नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच; मात्र त्याबरोबर गावातील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. शेत शिवाराचे आणि एकूणच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वेळा याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे काणाडोळा केला जात असून, स्थानिक प्रशासन तात्पुरती कार्यवाही करत आहे. मात्र वाळूउपसा एका वर्षापासून सुरू आहे. मागील वर्षी ओढा रुंदी व खोलीकरणाच्या नावाखाली हा वाळू उपसा सुरू केला. ओढ्याची खोली अगर रुंदी वाढ झाली नाहीच. मात्र ओढ्याचे विद्रूपीकरण झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे केल्याने ओढ्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. लगतच्या शेतजमिनी वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील माळवदकर मळा येथील या विहिरीची पाणीपातळी अगदी तळात गेली असून, कितीही दुष्काळ पडला तरीही या विहिरीची पाणीपातळी कधीही कमी झाली नव्हती. उलट आसपासच्या गावातील लोकही पाणी घेऊन जात असत, अशी माहिती जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीटओढ्याकाठच्या परिसरातील अनेक विहिरी त्याचप्रमाणे गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. मात्र, या विहीर परिसरात झालेल्या प्रचंड वाळूउपशामुळे यंदा एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अर्थपूर्ण सहकार्याचा ग्रामस्थांचा आरोप४नायगावच्या ओढ्यातून सध्या दररोज दोन ते चार ट्रक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. महसूल प्रशासनाकडे तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.