शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यंदा लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार पालख्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:12 IST

आषाढी वारी निमित्ताने पुण्यात येणाऱ्या वारक-यांचे स्वागत लोकसहभागातून व लोकप्रतिनिधींच्या निधीतून करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देन्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेचा निधी वारक-यांच्या स्वागतासाठी केला जाणार नाही.पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणात निधीवारीनिमित्ताने सतर्क राहण्याच्या सूचना पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या मार्गावर प्लास्टिक वापरावर निर्बंध

पुणे: आषाढी वारी निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दाखल होणा-या पालख्यांचे स्वागत पालिकेच्या निधीतून नाहीतर लोकप्रतिनिधींच्या निधीतून केले जाणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी जाहीर केले. त्यामुळे वारक-यांचे स्वागत लोकसहभागातून व लोकप्रतिनिधींच्या निधीतून करण्यात येणार आहे.   पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्व तयारीची बैठक विधान भवन येथे घेण्यात आली.आषाढी वारीनिमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोप-यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या वारक-यांना केंद्रबिंदू मानून आषाढी वारीची तयारी करण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साता-याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे,तीनही जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुणे मनपाचे आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता प्रवीण कीडे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे-पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुखांसह विविध दिंड्यांचे प्रमुख  या बैठकीस उपस्थित होते.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेचा निधी वारक-यांच्या स्वागतासाठी केला जाणार नाही. त्यामुळे स्थानिक खासदार,आमदार, नगरसेवक स्वत:च्या खर्चातून वारक-यांसाठी स्वागत कक्ष उभारले जातील. तसेच लोकसहभागातून निधी उभारून नागरिकांना आवश्यक बाबी पुरविल्या जातील,असे बापट यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील अधिका-यांनी भूसंपादनाची कामे वेगाने करावीत. भूसंपादन करताना बाधित शेतक-यांना योग्य व तातडीने मोबदला देण्यात यावा,अशा सूचना बापट यांनी दिल्या.तसेच आळंदी-देहू मार्गाच्या दुरूस्तीचे काम तातडीने करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दूरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. त्याचप्रमाणे पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुर्त्या स्वरूपात पुरेशा प्रमाणात शौचालये उभारण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व वीजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या मार्गावर प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी,असेही बापट यांनी सांगितले..........................वारीनिमित्ताने सतर्क राहण्याच्या सूचना वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उदभव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना बापट यांनी यावेळी दिल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका