शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आठवडा बाजार तब्बल ११ महिन्यांनंतर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. ...

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेले वर्षभर आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालासह इतर वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश झाल्या आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे. बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चक्र बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. लॉकडाऊन व संचारबंदीची झळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली होती. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले होते. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामुळे गावातील अर्थव्यवस्था आठवडा बाजारावर अवलंबून असते. कारण दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते.

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या गावांमध्ये रोजची भाजीपाल्याची मंडई भरते. परंतु या रोजच्या मंडईला आठवडा बाजाराची सर काहीकेल्या येत नाही. या बाजारात भाजीपाल्यासह नवे जुने कपडे, भेळ, जिलेबी, लाडू विक्री करणारी छोटी छोटी हाॅटेल, चादर, बेडसीट, जर्किन, स्वेटर, फुटाणे आदी सर्व प्रकारचे विक्रेते असतात. शासनाच्या निर्णयामुळे आठवडा बाजार बंद झाल्यावर या सर्व विक्रेत्यांपैकी भाजीपाला विक्रेत्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची रोजची मंडईमध्ये तसेच कवडीपाट टोलनाक्याजवळ भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु काल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सर्वांना तेथून हटवले आहे. त्यामुळे आज लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची भरपूर गर्दी झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे पाच कर्मचारी बाजारात उपस्थित असलेले विक्रेते व खरेदीसाठी आलेले ग्राहक यांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याबाबत आवाहन करताना दिसत होते.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची झालेली मोठी गर्दी.