शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आठवडा बाजार तब्बल ११ महिन्यांनंतर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. ...

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेले वर्षभर आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालासह इतर वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश झाल्या आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे. बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चक्र बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. लॉकडाऊन व संचारबंदीची झळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली होती. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले होते. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामुळे गावातील अर्थव्यवस्था आठवडा बाजारावर अवलंबून असते. कारण दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते.

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या गावांमध्ये रोजची भाजीपाल्याची मंडई भरते. परंतु या रोजच्या मंडईला आठवडा बाजाराची सर काहीकेल्या येत नाही. या बाजारात भाजीपाल्यासह नवे जुने कपडे, भेळ, जिलेबी, लाडू विक्री करणारी छोटी छोटी हाॅटेल, चादर, बेडसीट, जर्किन, स्वेटर, फुटाणे आदी सर्व प्रकारचे विक्रेते असतात. शासनाच्या निर्णयामुळे आठवडा बाजार बंद झाल्यावर या सर्व विक्रेत्यांपैकी भाजीपाला विक्रेत्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची रोजची मंडईमध्ये तसेच कवडीपाट टोलनाक्याजवळ भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु काल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सर्वांना तेथून हटवले आहे. त्यामुळे आज लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची भरपूर गर्दी झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे पाच कर्मचारी बाजारात उपस्थित असलेले विक्रेते व खरेदीसाठी आलेले ग्राहक यांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याबाबत आवाहन करताना दिसत होते.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची झालेली मोठी गर्दी.