शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा बाजार तब्बल ११ महिन्यांनंतर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. ...

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेले वर्षभर आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालासह इतर वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश झाल्या आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे. बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चक्र बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. लॉकडाऊन व संचारबंदीची झळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली होती. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले होते. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामुळे गावातील अर्थव्यवस्था आठवडा बाजारावर अवलंबून असते. कारण दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते.

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या गावांमध्ये रोजची भाजीपाल्याची मंडई भरते. परंतु या रोजच्या मंडईला आठवडा बाजाराची सर काहीकेल्या येत नाही. या बाजारात भाजीपाल्यासह नवे जुने कपडे, भेळ, जिलेबी, लाडू विक्री करणारी छोटी छोटी हाॅटेल, चादर, बेडसीट, जर्किन, स्वेटर, फुटाणे आदी सर्व प्रकारचे विक्रेते असतात. शासनाच्या निर्णयामुळे आठवडा बाजार बंद झाल्यावर या सर्व विक्रेत्यांपैकी भाजीपाला विक्रेत्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची रोजची मंडईमध्ये तसेच कवडीपाट टोलनाक्याजवळ भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु काल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सर्वांना तेथून हटवले आहे. त्यामुळे आज लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची भरपूर गर्दी झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे पाच कर्मचारी बाजारात उपस्थित असलेले विक्रेते व खरेदीसाठी आलेले ग्राहक यांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याबाबत आवाहन करताना दिसत होते.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची झालेली मोठी गर्दी.