शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

आठवडा बाजार तब्बल ११ महिन्यांनंतर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. ...

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेले वर्षभर आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालासह इतर वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश झाल्या आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे. बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चक्र बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. लॉकडाऊन व संचारबंदीची झळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली होती. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले होते. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामुळे गावातील अर्थव्यवस्था आठवडा बाजारावर अवलंबून असते. कारण दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते.

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या गावांमध्ये रोजची भाजीपाल्याची मंडई भरते. परंतु या रोजच्या मंडईला आठवडा बाजाराची सर काहीकेल्या येत नाही. या बाजारात भाजीपाल्यासह नवे जुने कपडे, भेळ, जिलेबी, लाडू विक्री करणारी छोटी छोटी हाॅटेल, चादर, बेडसीट, जर्किन, स्वेटर, फुटाणे आदी सर्व प्रकारचे विक्रेते असतात. शासनाच्या निर्णयामुळे आठवडा बाजार बंद झाल्यावर या सर्व विक्रेत्यांपैकी भाजीपाला विक्रेत्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची रोजची मंडईमध्ये तसेच कवडीपाट टोलनाक्याजवळ भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु काल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सर्वांना तेथून हटवले आहे. त्यामुळे आज लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची भरपूर गर्दी झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे पाच कर्मचारी बाजारात उपस्थित असलेले विक्रेते व खरेदीसाठी आलेले ग्राहक यांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याबाबत आवाहन करताना दिसत होते.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची झालेली मोठी गर्दी.