शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

आम्ही स्वबळावर लढणार

By admin | Updated: April 14, 2016 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसला समाधानकारक अनुभव मिळालेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, याकरिता पक्षाची चांगली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसला समाधानकारक अनुभव मिळालेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, याकरिता पक्षाची चांगली बांधणी करून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले. गटबाजी दूर करून पक्षाला आलेली मरगळ झटकणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.काँग्रेस पक्षाच्या शहराध्यपदी निवड झाल्यानंतर रमेश बागवे यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक अविनाश बागवे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी, पक्षाचे पदाधिकारी रमेश अय्यर, नौशाद शहाणी, जुबेर दिल्लीवाले, रोहित अवचिते या वेळी उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले, ‘‘सुरेशभार्इंचा कार्यकर्त्यांना आधार होता, त्यांच्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीनंतर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात होते. आता शहराध्यक्ष म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पक्षाला एकसंध ठेवून वाटचाल केली जाईल. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक एकत्र बसून चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतील.’’एमआयएमबद्दल बागवे म्हणाले, ‘‘एमआयएम हे भाजपाचेच पिल्लू आहे. नुकत्याच मुस्लिमबहुल कोंढवा भागात झालेल्या नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला. टीमवर्कमुळे हे यश मिळाले़ पालिका निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने यशस्वी सामना करू.’’गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली, त्यामुळे गटबाजी दूर करण्यावर यापुढील काळात भर दिला जाणार आहे. दर आठवडयाला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, नगरसेवकांशीही नियमित संवाद साधला जाईल. मेट्रो, बीआरटी, कचरा असे अनेक प्रश्न रखडले आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आंदोलन केले जाईल, असेही रमेश बागवे यांनी सांगितले़वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यातप्रभागात एकाच पक्षाचे नगरसेवक असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद होतात. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळे वॉर्ड पद्धतच अधिक योग्य आहे. वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असणार असल्याचे रमेश बागवे यांनी या वेळी स्पष्ट केले.