शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

आम्ही स्वबळावर लढणार

By admin | Updated: April 14, 2016 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसला समाधानकारक अनुभव मिळालेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, याकरिता पक्षाची चांगली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसला समाधानकारक अनुभव मिळालेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, याकरिता पक्षाची चांगली बांधणी करून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले. गटबाजी दूर करून पक्षाला आलेली मरगळ झटकणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.काँग्रेस पक्षाच्या शहराध्यपदी निवड झाल्यानंतर रमेश बागवे यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक अविनाश बागवे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी, पक्षाचे पदाधिकारी रमेश अय्यर, नौशाद शहाणी, जुबेर दिल्लीवाले, रोहित अवचिते या वेळी उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले, ‘‘सुरेशभार्इंचा कार्यकर्त्यांना आधार होता, त्यांच्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीनंतर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात होते. आता शहराध्यक्ष म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पक्षाला एकसंध ठेवून वाटचाल केली जाईल. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक एकत्र बसून चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतील.’’एमआयएमबद्दल बागवे म्हणाले, ‘‘एमआयएम हे भाजपाचेच पिल्लू आहे. नुकत्याच मुस्लिमबहुल कोंढवा भागात झालेल्या नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला. टीमवर्कमुळे हे यश मिळाले़ पालिका निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने यशस्वी सामना करू.’’गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली, त्यामुळे गटबाजी दूर करण्यावर यापुढील काळात भर दिला जाणार आहे. दर आठवडयाला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, नगरसेवकांशीही नियमित संवाद साधला जाईल. मेट्रो, बीआरटी, कचरा असे अनेक प्रश्न रखडले आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आंदोलन केले जाईल, असेही रमेश बागवे यांनी सांगितले़वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यातप्रभागात एकाच पक्षाचे नगरसेवक असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद होतात. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळे वॉर्ड पद्धतच अधिक योग्य आहे. वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असणार असल्याचे रमेश बागवे यांनी या वेळी स्पष्ट केले.