शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही ७ किलोमीटरवर; चालकाने जागेवरच थांबायला सांगितले, पुण्याच्या पर्यटकाची हकीकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:07 IST

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले

उरुळी कांचन(पुणे) : घटना घडली त्या ठिकाणापासून अलीकडे ७ किलोमीटर अंतरावर आम्ही होतो. आमच्या ग्रुप मधील एका इनोव्हा चार चाकी चालकाने प्रसंगावधान राखून फोन करून आम्हास जागेवर थांबायला सांगितले. अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या समशेर शेख यांनी दिली. उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे येथील पहलगाम पर्यटनासाठी गेलेले समशेर शेख व त्यांची पत्नी शाईन, मुलगा सिद्दिक हे श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मागील पाच दिवसांपूर्वी ज्योती झुरुंगे या महिलेने एकूण ७० नागरिक पर्यटनासाठी सर्व व्यवस्थापन करून नेले होते. सर्वजण रेल्वेने जाऊन तेथील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी तेथील स्थानिक चार चाकी वाहनाने पर्यटन स्थळ पाहत होते. २५ तारखेला त्यांचे रेल्वेची परतीची तिकिटे आरक्षित होती.

 समशेर शेख यांनी सांगितलेली कहाणी अशी की, ७० पर्यटक हे शिरूर दौंड हवेली अशा तालुक्यातून गेलेले होते. ग्रुप करून चार चाकी वाहनामध्ये पर्यटन स्थळ पाहायला जात असताना दहशवादी हल्ला झाल्याची घटना घडली. त्या ठिकाणापासून सात किलोमीटर अलीकडे अंतरावर होती. व त्यांच्याच ग्रुप मधील एक गाडी घटनेच्या एक किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. दुसऱ्या गाडीच्या चालकाने जेव्हा घटना घडली त्या ठिकाणापासून लोकांचे धावपळ, व चार चाकी गाड्या थांबल्याचा अंदाज आला. दुसऱ्या गाडीच्या शेजारी थांबलेल्या एका गाडीतील ड्रायव्हरने लगेचच खुणावले व परत फिरण्यास सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले. व लगेचच आम्ही असलेल्या चार चाकी गाडीतील चालकाला फोन करून सांगितले की, पुढे येऊ नका या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.

आम्ही लगेचच गाडी जागेवर थांबवली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती सुरक्षित पाठवल्या. आमच्या पुढच्या ग्रुपमधील वाहनचालकाने लगेचच फोन करून सांगितल्यामुळे आम्ही बचावलो व पुढील अनर्थ टळला. माझे माझ्या घरच्यांशी संपर्क चालू आहे. आम्ही सुरक्षित आहोत. मला माझे वडील अब्दुल गफूर व आई सलीमा शेख यांनी संपर्क केला. आमचे बोलणे झाल्यानंतर ते सर्व चिंतामुक्त झाले.

माझा भाऊ समशेर शेख व त्याची पत्नी व मुलासह रेल्वेने ५ दिवसापूर्वी पर्यटनासाठी गेले होते. परंतु घटना घडली त्या दिवशी बातम्यांमधून मधून जेव्हा ही घटना समजली तेव्हा मी व माझे आई-वडील आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आम्ही लगेचच भाऊ समशेर याला फोन केला व तो आमच्याशी बोलला आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती पाठवून दिले आहेत व आम्ही लवकरच घरी येऊ. आई वडील त्यांच्याशी बोलले व आम्ही सर्व चिंतामुक्त झाले.-  युनुस शेख, पर्यटक समशेर शेख यांचा भाऊ

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाuruli kanchanउरुळी कांचनJammu Kashmirजम्मू-काश्मीरhotelहॉटेल