शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदु-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते", मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:53 IST

राज्यकर्त्यांनी लाेकांचा धर्म पाहायचा नसताे; डॉ. केदार फाळके लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : राज्यकर्त्यांनी लाेकांचा धर्म पाहायचा नसताे. हिंदु-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले. सद्य:स्थितीवरही भाष्य केले.

डॉ. केदार फाळके लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. श्री शिवाजी मेमोरियल कमिटी श्रीशैलम यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, श्री शिवाजी मेमोरियल समितीचे कार्याध्यक्ष सुब्बा रेड्डी, उदय खर्डेकर, रघुराजे आंग्रे आदी उपस्थित होते.

हिंदुस्थानवर झालेले अरबी आक्रमण राक्षसी व रानटी होते. इस्लामच्या आक्रमणाचे स्वरूप वेगळे हाेते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. मंदिरे तोडून मानसिक खच्चीकरण करण्याचा हेतू छत्रपतींनी हेरला. त्याविराेधात संघटित शक्ती उभी करून स्वराज्य उभे केले. यामुळेच महाराष्ट्र टिकला. छत्रपतींच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीमध्ये हाेते ताेपर्यंत हिंदूंचं साम्राज्य वाढत राहिलं. भागवत म्हणाले की, इस्लामी आक्रमणाविरोधात कसे प्रयत्न करायला हवेत याचा विचार अनेक वर्षे सुरू होता. भारत टिकणार की नाही याचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानेे मिळाले. त्यांचा आदर्श त्रिकालाबाधित आहे. तो लढा स्वदेशी विरुद्ध विदेशी होता, असेही त्यांनी नमूद केले.

हिंदुस्थानवरील आक्रमण फार पूर्वी सुरू झाले. जेवढं लुटता येईल तेवढं लुटलं. नंतर इस्लामी आक्रमण झालं. हे आक्रमण वेगळं हाेतं. हे समजायला वेळ लागला. इस्लाम आक्रमकांनी परंपरा, धर्म माेडायला लावला. त्याचा प्रतिकार करीत यशस्वी झालेला पहिला लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याच्यातून अटकेपार झेंडे फडकवण्याची प्रेरणा पुढे मिळाली.

शिवाजी महाराजांनी दिलेली ध्येयनिष्ठता अटकेपार झेंडे फडकवण्यापर्यंत होती. मराठ्यांचे सैन्य हिंदू म्हणून लढले नाही. आजही तीच लढाई आहे. असुरांशी लढाई आहे आणि याचे केंद्रही भारतच आहे. भेद न करता सर्वांना एकत्र उभे राहावे लागेल, असेही भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतHinduहिंदूMuslimमुस्लीमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज