शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:32 IST

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देलेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखलक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रदान

पुणे : आज भारतात कुरूपता वाढत चालली आहे. असहिष्णुता, धार्मिकता याचे बंध अधिक घट्ट होत असल्याने संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत, अशी खंत ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. लेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. २१ हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त आर. पी. जोशी उपस्थित होते.खरा लेखक तो असतो जो दलित आणि शोषितांचा आवाज बनतो. खरा लेखक हा पुरोगामी असतो. प्रतिव्यवस्था सत्ताकेंद्री झाली की ती इतरांचे शोषण करते. याच व्यवस्थेला हादरा दिला पाहिजे. आज विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद या तिन्हींपासून आपण दूर आहोत. आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. आंधळेपणाने विश्वास ठेवून सर्व गोष्टींचा स्वीकार करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी समाजव्यवस्थेवर बोट ठेवले. महिला असुरक्षितता, समान दर्जा  यापासून ते शेतकरी आत्महत्या या विषयावर त्यांनी भाष्य केले. सध्या सावित्रीची लेक विरुद्ध जोतिबाचा पुत्र असा संघर्ष सुरू आहे. स्त्रीकडे बुद्धी आणि कर्तव्य आहे, प्रतीक्षा आहे समानतेची. तिला समाजात समान स्थान देणे पुरुषवर्गाला मान्य आहे का? तर हे चित्र नक्कीच आशादायी नाही. पुरोगामी आणि सुसंस्कृततेचा वारसा पुढे नेण्यात जोतिबाचा पुत्र कमी पडला आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. 

काकासाहेब गाडगीळ काँग्रेसचे होते खरे कार्यकर्तेखरा काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे काकासाहेब गाडगीळ होते. साधनशुचिता आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखPuneपुणे