शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

आम्हीही माणसेच; मग आमची उपेक्षा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:59 IST

किन्नरांचा आर्त सवाल : पदरी अपमान नेहमीचाच, आमच्याविषयी गैरसमजच अधिक

पुणे : केवळ निसर्गाच्या करामतीने आम्हाला किन्नरांचे जिने जगावे लागत आहे़ जगण्यासाठी पैैसा हवा असतो, त्यासाठी आमच्यातील काही जण विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवून अश्लील हवभाव करतात म्हणून आम्हाला दूर ठेवले जाते, आम्हीही तुमच्यासारखे माणसेच आहोत, मग समाजाकडून आमची उपेक्षा का केली जाते़, असा आर्त सवाल तृतीयपंथियांकडून विचारला जात आहे़पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही शासनाकडून तसेच समाजाकडून तृतीयपंथियांची उपेक्षा केली जाते़ त्यामुळे पदोपदी त्यांना हेटाळणी सहन करावी लागते़सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये देशातील किन्नरवर्गाला तृतीयपंथी म्हणून लिंगओळख देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी शासकीय कागदपत्रांवरदेखील त्यांना ओळख मिळू लागली. मात्र, हा बदल केवळ कागदपत्रापुरताच मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. अद्यापही तृतीयपंथी म्हटल्यास सर्वसामान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल भीती आणि संशय बळावतो. आरोग्य, शिक्षण, रोजगार यात तृतीयपंथीयांच्या पदरात निराशा पडत असल्याची खंत अनेक तृतीयपंथी व्यक्त करतात. मागील काही महिन्यांपूर्वी सोनाली दळवी या तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद सामाजिक माध्यमांमध्ये उमटले होते. त्याची दखल घेवून मॉलच्या प्रशासनाने माफीदेखील मागितली. रोजगार, नोकºया याबाबत तृतीयपंथीयांवर अन्याय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोकरीची कुठलीच संधी त्यांच्या वाट्याला येत नाही. इतर राज्यांमध्ये मात्र किन्नरांकरीता विविध अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी तमिळनाडू राज्यात पोलीस भरतीकरिता तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली. त्या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेले काही किन्नर हे आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहेत.पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात याच्या उलट चित्र पाहवयास मिळते. समाजापासून वाळीत टाकल्या गेलेल्या या व्यक्तींना अर्थाजनाच्या कुठल्याच वाटा शिल्लक ठेवल्या नसल्याने त्यांना नाईलाजाने देहविक्री या व्यवसायाकडे वळत आहेत.शासकीय सेवासुविधांचा अभाव1राज्यात तृतीयपंथीयांकरिताच्या रोजगारासाठी जीआर पास नाही. दैनंदिन उपजीविकेसाठी काय करता, असं विचारल्यानंतर बºयाच किन्नरांकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. मात्र, आम्ही शाळा, महाविद्यालये, इतकेच नव्हे तर अंगणवाडी, बालवाडी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास तयारी असल्याचे असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्याविषयी महिलांना नव्हे तर पुरुषांना भीती आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी गैरसमज आहेत. पहिल्यांदा आमच्याकडे माणूस म्हणून बघायला तयार झाल्यास अर्धी लढाई जिंकल्यासारखी असल्याची भावना तृतीयपंथीयांची आहे.2तृतीयपंथीयांमध्ये प्रामुख्याने गुरू आणि चेला परंपरा आहे. यानुसार गुरुने उदरनिर्वाहासाठी काही करायला सांगितल्यास त्यानुसार कार्य करावे लागते. अनेकदा व्यवसाय म्हणून किराणा मालाची दुकाने सुरू केल्यानंतरदेखील केवळ ते दुकान एका तृतीयपंथीयाने सुरू केले आहे म्हणून खरेदी करण्यास टाळाटाळ केली जाते.आमच्या हातचे जेवण चालणार नाही का?धंदाच करतो आम्ही असं म्हणणाºयांना कामाची संधी देऊन तर बघा. कित्येक तृतीयपंथी कामाच्या शोधात आहेत. मात्र त्यांना काम दिले जात नाही. पाककलेत एखाद्या महिलेला लाजवेल, असा स्वयंपाक काही तृतीयपंथी करतात. मग अशा तृतीयपंथीयांना डबे पुरविण्याची संधी समाज देणार की नाही? आमच्या हातचे जेवण चालणार आहे का? असा प्रश्न किन्नर उपस्थित क रतात.

टॅग्स :LGBTएलजीबीटी