शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाटलूजला वाळू तस्करांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST

राजेगाव : वाटलूज (ता.दौंड) येथील भीमा नदीपात्रात दौंड पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या ...

राजेगाव : वाटलूज (ता.दौंड) येथील भीमा नदीपात्रात दौंड पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या ५ फायबर बोटी व ५ सक्शन बोटी जिलेटीनच्या साह्याने नष्ट केल्या. या कारवाईत वाळूमाफियांचे १ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच ५० हजारांची १० ब्रास वाळूचा पंचनामा करून तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशाने ती नष्ट करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. २४) सायंकाळी ५च्या दरम्यान करण्यात आली. पथकाची चाहूल लागताच वाळू उपसा करणाऱ्या मंडळींनी पळ काढला.

या प्रकरणी टलूज गावचे गावकामगार तलाठी नंदकुमार संपतराव खरात यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नाना शेंडगे, महम्मद शेख,, शरद शेंडगे, माऊली झि, सलीम शेख (सर्व रा. वाटलूज) यांच्याविरुध्द चोरी करणे व गौण खनिजाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, सहायक फौजदार पोपट जाधव, पोलीस कर्मचारी दीपक वायकर, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, अमोल गवळी, किरण राऊत, विशाल जावळे, आमिर शेख, अमोल देवकाते, अभिजित गिरमे व नाना उबाळे तर महसूलचे रावणगाव मंडल अधिकारी मंगेश नेवसे, विजय खारतोडे, जयंत भोसले, दीपक आजबे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

जर कोणी भीमा नदीच्या पात्रामधून अवैध वाळू उपसा केल्यास अशा प्रकारची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला.

फोटो आहे : वाटलूज येथे जिलेटीनच्या साह्याने वाळू उपसा करणाऱ्या बोटी नष्ट करण्यात आल्या.