शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

जलयुक्त शिवार पडले कोरडे ठाक, नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:26 IST

सिंहगड किल्ल्याच्या वाड्या- वस्त्यांत गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे.

खडकवासला : सिंहगड किल्ल्याच्या वाड्या- वस्त्यांत गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनांचे बंधारे, तसेच विहिरी, पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत.भीषण पाणीटंचाईने घेरा सिंहगडच्या हद्दीतील सांबरेवाडी, तसेच खामगाव मावळ येथील चांदेवाडी येथील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे प्रशासन या प्रश्नाप्रती ढिम्म आहे. हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात महिला, नागरिक वणवण भटकत आहेत. त्याचबरोबर भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांना जनावरे जगविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.>सर्वांत गंभीर स्थिती सांबरेवाडी येथे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील विहिरी, पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत. येथील नागरिकांना मिळेल तेथून डोक्यावरून; तसेच टेम्पो, मोटरसायकल, वाहनांवरून पाणी आणावे लागत आहे. जलयुक्त शिवारातून बांधलेले गावचे दोन्ही बंधारे कोरडे आहेत. विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या चांदेवाडी येथेही अशीच गंभीर स्थिती आहे.खानापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर सांबरेवाडी खानापूरपर्यंत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाण्याचा पुरवठा होतो. आमच्या वाडीत राजकीय इच्छाशक्ती आणि निधीअभावी अशा योजना पोहोचल्या नाहीत. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले की पाण्याची वणवण सुरू होते. डिसेंबरपासून वर्गणी काढून पाण्याचा टँकर मागवत आहे, तर काही कुटुंबांतील स्त्रिया डोक्यावर हंड्याने पाणी आणतात.- हरिश्चंद्र जोरकर, नागरिक, सांबरेवाडी