शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

जिल्ह्यात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 12, 2015 04:09 IST

जिल्ह्यात १८ टँकरने १४ गावे व ८० वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी एकट्या बारामतीत ८ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला २४ टँकरने पाणीपुरवठा होत होता.

पुणे : जिल्ह्यात १८ टँकरने १४ गावे व ८० वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी एकट्या बारामतीत ८ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला २४ टँकरने पाणीपुरवठा होत होता. या वर्षी जिल्ह्यात टँकरचे प्रमाण कमी दिसत असले, तरी टंचाईची तीव्रता जास्त आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तालुक्यातून आले आहेत. मात्र, तेथे टँकरच सुरू झाले नाहीत. गेल्या वर्षी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. त्यामुळे तालुकापातळीवर मागणीनुसार त्वरित टँकर सुरू होत असे. आता तहसीलदारांचे अधिकार काढून ते पुन्हा जिल्हाधिकारी यांना दिल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून तहसीलदाराकडे व त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर मंजुरी दिली जात. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने टँकर लवकर मिळत नाहीत. त्यामुळे टंचाई असूनही टँकर न मिळल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जिल्ह्यात १८ टँकरने १४ गावे, ८० वाड्यांवर सुमारे २४ हजार ५९२ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात बारामतीत ८ टँकरने ४ गावे, ४१ वाड्यावस्त्यांवर १४ हजार ९५ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जास्त असून, ५ टँकरने २ गावे २७ वाड्यांना पाणी दिले जात आहे. आंबेगाव तालुक्यात दोन टँकर सुरू असून, ४ गावे, ६ वाड्यावस्त्यांवर ३ हजार ६९० लोकसंख्येला टँकरने पाणी सुरू आहे. भोर तालुक्यात ३ गावे व २ वाड्यांना २ टँकर सुरू आहेत. दौंड तालुक्यात १ टँकरने १ गाव, ४ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी ८ विहिरी अधिगृहित केल्या आहेत. (प्रतिनिधी)