शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये पाण्यासाठी संघर्ष : पोपटराव पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:36 IST

वाढते तापमान चिंताजनक

ठळक मुद्देतळेगावमधील व्याख्यानमालेत मार्गदर्शन रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला

तळेगाव दाभाडे : वाढते तापमान हे चिंताजनक आहे. पर्यावरण आणि निसर्ग संपदा जपली पाहिजे. जगात शंभरपेक्षा अधिक देश पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वत्र राबविला गेला पाहिजे. वनसंपदा जपली पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारमध्ये पाण्याचा ताळेबंद विद्यार्थी करतात. शासकीय निधी आणि योजनेचा पुरेपूर वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गाव जगाच्या पटलावर गेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदर्श ग्राम कार्यक्रम निदेशक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘वन, मृद, पाणी : युवकांचे योगदान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना पवार बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, खजिनदार चंद्रकांत शेटे, संचालक शैलेश शाह, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, संजय साने, निरुपा कानिटकर, उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, राजश्री म्हस्के, मनोज ढमाले, दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, सचिन टकले यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.पोपटराव पवार पुढे म्हणाले, आज जगभर पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी  कमालीची खाली गेली आहे. आपल्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी अवलंबलेली जलनीती राबविणे आवश्यक आहे. आज ज्या भागात जास्त पाऊस पडतो, त्याच भागात पाणीटंचाई दिसते आहे. योग्य नियोजन करून पाण्याचे पुनर्भरण करता येते, ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रस्तावित संदीप काकडे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती कन्हेरीकर आणि आर. आर. डोके यांनी केले. चंद्रभान खळदे यांनी आभार मानले............पोपटराव पवार पुढे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुनर्भरणासोबतच मातीसंवर्धन करणेही निकडीचे आहे. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसWaterपाणीHiware BazarहिवरेबाजारTemperatureतापमान