शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘पाणी योजना’ सौरऊर्जेवर करणार

By admin | Updated: March 29, 2017 00:10 IST

थकीत वीजबिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

डोर्लेवाडी : थकीत वीजबिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिलाबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल. तसेच बारामती तालुक्यातील योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.बारामती तालुक्यातील ६८ व इंदापूर तालुक्यातील १०७ पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन महावितरणने बंद केले होते. यामुळे जवळपास दोन्ही तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा थांबला होता. त्यामुळे बारामती तालुक्यातील मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष गौतम थोरात, सचिव सोमनाथ भिले, सदस्य कांतीलाल काळकुटे, अर्जुन झगडे, दत्तात्रय भिसे, हनुमंत देवकाते, सचिन निलाखे, दादा गोफने यांच्यासह बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, नाना सातव ,युवराज देवकाते यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश बापट यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल टप्प्याटप्याने भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी केली.बापट यांनी मेखळी, सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शिष्टमंडळाबरोबर योजनांची बिले भरण्याकामी येत असलेल्या अडीअडचणींबाबत सखोल चर्चा केली. तसेच या संस्थांच्या वीजबिलावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आगामी काळात ही पाणीपुरवठा योजना बारामती येथील कंपनींच्या सी.एस.आर. फंडातून सौरऊर्जेवर करण्याबाबत पडताळणी करण्याचे आश्वासन दिले. थकीत सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडीत झालेल्या जवळपास सर्वच संस्थांनी मूळ थकबाकीपैकी २० टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण वीजबिल भरले. त्यामुळे या सर्व योजनांचा वीजपुरवठा गेल्या आठवड्यात पूर्ववत करण्यात आला आहे. परिणामी पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)२0 टक्के रक्कम : वीज पूर्ववतबारामती व इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ऐन टंचाईच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक संस्था एकरकमी थकीत बिलाची परतफेड करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती या शिष्टमंडळाने बावनकुळे व बापट यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे चालू महिन्याचे पूर्ण बिल तसेच व्याज व दंडाची रक्कम सोडून असणाऱ्या मूळ थकबाकीची २० टक्के रक्कम दर महिन्याला थकीत संस्थेने अदा करावी. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.