शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

पाणी योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 23:39 IST

पानवली, वडगावबांडे आणि टाकळी भीमा (ता. दौंड) या तीन ग्रामपंचायतींसाठी मंजूर झालेली जलप्राधिकरण योजना कागदावरच राहिल्याने त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

राहू : पानवली, वडगावबांडे आणि टाकळी भीमा (ता. दौंड) या तीन ग्रामपंचायतींसाठी मंजूर झालेली जलप्राधिकरण योजना कागदावरच राहिल्याने त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेसाठी बांधण्यात आलेली विहीरही कागदावरच असल्याची माहिती जलप्राधिकरण कार्यालयात मिळालेल्या कागदपत्रांवरून पुढे आली आहे. संबंधित ग्रामपंचायतीतही योजनेची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या तीन गावांच्या जलप्राधिकरण योजनेसाठी १ कोटी ८८ लाख रुपये खर्च करून २००४ रोजी कार्यान्वित करण्यात आली असल्याचे केवळ कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या योजनेचे पाणीही कधीच प्यायला मिळाले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. योजनेसाठी खोदण्यात आलेली विहीर ही फक्त कागदावरच असल्याचे इंदापूर जलप्राधिकरण विभागीय कार्यालयाकडील मिळालेल्या दस्तऐवजावरून दिसत आहे. ही योजना कार्यान्वित झाली असल्याचे जलप्राधिकरणाचे म्हणणे होते. त्यानुसार ही योजना या तिन्ही ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा केला होता. तसे प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारावरून दिसत आहे; परंतु ही योजना तिन्ही ग्रामपंचायतींनी वर्ग करून घेण्यास टाळाटाळ केल्याचे जल प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारावरून दिसते, तर दुसरीकडे या तिन्ही ग्रामपंचायती त्यामध्ये वडगावबांडेचे तत्कालीन सरपंच अप्पासाहेब कुलाळ, उपसरपंच तानाजी मेमाणे, पानवलीचे तत्कालीन सरपंच गोविंदराव बोरावणे तर टाकळी भीमाचे सरपंच विलास कुंभार यांनी जिल्हा प्राधिकरण उपअभियंता यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारानुसार सन २००५मध्ये या तिन्ही ग्रामपंचायतींनी ही योजना सुरळीत चालू असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. परंतु, ही योजना सुरळीत असल्याचे दाखविले असतानाही योजना ग्रामपंचायतीने स्वत:कडे वर्ग करून का घेतली नाही, असाही प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहे. संबंधित या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जलप्राधिकरण योजना चालविण्यापेक्षा ती बंद पाडणे, हाच तत्कालीन सदस्यांचा उद्देश असल्याचे दिसून येते. ही योजना चालू आहे, असा पत्रव्यवहार जलप्राधिकरणाला करण्यासाठी व ग्रामपंचायतीचे ठराव देण्यासाठी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेल्या पाटस गावात बैठक झाली व तद्नंतर यवत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात हे ठराव व पत्रव्यवहार करण्यात आले. काम पूर्ण नसतानाही हे काम पूर्ण आहे, असे पत्र व ठराव तयार करा, असे तालुक्यातील एका पुढाऱ्याने ठणकावून सांगितल्याने नाइलाजास्तव हे ठराव आणि पत्र द्यावे लागल्याचे या बैठकीतील ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ...तर ते पत्र का दिले?याबाबत ही योजना ट्रायल घेतल्यानंतर ताब्यात घ्या, असे जलप्राधिकरण म्हणत होते; परंतु उर्वरित काम अपूर्ण होेते. पूर्ण करण्यासाठी आम्ही मागणी केली होती; परंतु जलप्राधिकरण योजनेने ते काम पूर्ण न केल्याने ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करून घेतली नाही. मात्र, ही योजना सुरळीत असल्याचे पत्र आमच्या ग्रामपंचायतीने का दिले, हे मला माहीत नसल्याचे तत्कालीन उपसरपंच तानाजी मेमाणे यांनी सांगितले.