शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

धरणांतील पाणीसाठा कमी! पाणलोट क्षेत्रात नाही पाऊस, कपात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:03 IST

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.

पुणे : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली तर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. मात्र, सध्या तरी पुण्यात पाणी कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मॉन्सून काही दिवस आधी दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार मुंबईसह कोकण व विदर्भात काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास अद्याप सुरुवात झाली नाही. त्यातच नियोजनानुसार दौंड-इंदापूर भागातील नागरिकांना शेती व पिण्यासाठी २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले.महिनाभरापूर्वी धरणात चार टीएमसीपेक्षा जास्त असलेला पाणीसाठा आता ३.३५ टीएमसीपर्यंत आला आहे. जून महिना संपलाअसून पुण्यात केवळ एकच दिवस५५ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.गेल्या काही दिवसांपासून शहरव धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्यासरी बरसत आहेत. आणखीकाही दिवस अशीच स्थिती राहिलीतर पाणीटंचाईला सामोरे जावेलागू शकते.धरणसाखळीत ३.३५ टीएमसी साठापुणेकर क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरतात, अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी यापूर्वी केली आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत नेहमीच अधिकचे पाणी साठवून ठेवले जाते. सध्या धरणसाखळीत ३.३५ टीएमसी एवढा साठा आहे. मात्र, गेल्या वर्षी ३० जून रोजी धरणात ४.१८ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणसाठा कमी असला तरी येत्या १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.खडकवासला धरणसाखळीत १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सध्यातरी धरणांमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पाणीकपात करण्याबाबत कोणतेही पत्र जलसंपदा विभागाने पालिकेला दिले नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता,खडकवासला पाटबंधारे विभागपालिका प्रशासनातर्फे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच सध्या खडकवासला धरणसाखळीत पुरेसा पाणीपुरवठा आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही.- व्ही. जी. कुलकर्णी,पाणीपुरवठा विभाग प्रमुख

टॅग्स :Puneपुणे