शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

धरणांतील पाणीसाठा कमी! पाणलोट क्षेत्रात नाही पाऊस, कपात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:03 IST

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.

पुणे : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली तर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. मात्र, सध्या तरी पुण्यात पाणी कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मॉन्सून काही दिवस आधी दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार मुंबईसह कोकण व विदर्भात काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास अद्याप सुरुवात झाली नाही. त्यातच नियोजनानुसार दौंड-इंदापूर भागातील नागरिकांना शेती व पिण्यासाठी २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले.महिनाभरापूर्वी धरणात चार टीएमसीपेक्षा जास्त असलेला पाणीसाठा आता ३.३५ टीएमसीपर्यंत आला आहे. जून महिना संपलाअसून पुण्यात केवळ एकच दिवस५५ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.गेल्या काही दिवसांपासून शहरव धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्यासरी बरसत आहेत. आणखीकाही दिवस अशीच स्थिती राहिलीतर पाणीटंचाईला सामोरे जावेलागू शकते.धरणसाखळीत ३.३५ टीएमसी साठापुणेकर क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरतात, अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी यापूर्वी केली आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत नेहमीच अधिकचे पाणी साठवून ठेवले जाते. सध्या धरणसाखळीत ३.३५ टीएमसी एवढा साठा आहे. मात्र, गेल्या वर्षी ३० जून रोजी धरणात ४.१८ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणसाठा कमी असला तरी येत्या १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.खडकवासला धरणसाखळीत १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सध्यातरी धरणांमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पाणीकपात करण्याबाबत कोणतेही पत्र जलसंपदा विभागाने पालिकेला दिले नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता,खडकवासला पाटबंधारे विभागपालिका प्रशासनातर्फे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच सध्या खडकवासला धरणसाखळीत पुरेसा पाणीपुरवठा आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही.- व्ही. जी. कुलकर्णी,पाणीपुरवठा विभाग प्रमुख

टॅग्स :Puneपुणे