शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 02:18 IST

पोलीसलाईनमधील नागरिकांची समस्या; पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांना नाहक त्रास

पुणे : पोलीस लाईन या भागात दोन, तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. ते पाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. असे त्या भागातील नागरिक म्हणत असून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी दररोज पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करीत आहेत. पाणी नक्की जिरते कुठे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.सोमवार पेठ येथील पोलीस लाईनमध्ये सर्व शासकीय कर्मचारी राहतात. त्या ठिकाणी एकूण चार मजल्याच्या आठ इमारती असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक इमारतीवर महापालिकेने बांधून दिलेली एक टाकी आहे. गेले सहा महिने झाले, येथील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. पाण्याची वेळ कधीही ठरलेली नसते. पाणी आले की अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. महिलांना पाणी नसल्याने परिसरातील आजूबाजूला पाण्यासाठी फिरावे लागते. घरातील पाण्याची कामे करण्यासाठी पाण्याची वाट बघावी लागते. पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नागरिकांनी नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली जात नाही. महानगरपालिकेने एक टाकी बांधून दिली होती. पण त्या टाकीचे पाणी पुरत नसल्याने नागरिकांनी आणखी टाकी बांधण्याची मागणी केली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सिंटेक्सच्या टाक्या बांधून देण्यात आल्या. परंतु या टाक्यांची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. त्यांना झाकण नसून फरशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कधी कधी अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच महापालिकेकडून चार ते पाच वर्षांनी टाकीची स्वच्छता केली जाते. पाणीपुरवठा कधी तरी झाला तरी पाण्याचे प्रेशर फारच कमी असते.यामुळे टाकी भरण्यास फारच वेळ लागतो. सायंकाळी पाण्यासाठी नागरिकांना या भागात खूप फिरावे लागते. नगरसेवक टँकरची सोय करून देतात. परंतु चारमजली इमारती असल्याने पहिल्या मजल्यावर पाणी घेऊन जाण्यास काही वाटत नाही. इतर वरच्या मजल्यावरील लोकांना पाणी तळापासून वर घेऊन जाण्यास खूप त्रास होत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये कुठलीही समस्या नाही. पण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. येथे राहणारे सर्व नागरिक शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आम्हाला तक्रार करायलासुद्धा भीती वाटते. तरीही आमच्या प्रभागातील नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली गेली नाही. पाण्याची ही गंभीर समस्या सोडवावी, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.ऋषीकेश रोकडे , रहिवासीपाण्यासाठी आंदोलन होत आहे. सोमवार पेठ पोलीस लाईनसहित, नाना पेठ, वायएमसीए, घोडमळा, किºहाडवाडा या सर्व ठिकाणी पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणीपुरवठ्याच्या कमतरतेमुळे मी टँकरची सोय करून दिली आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. आता मात्र सकाळच्या ११ ते २ या वेळेत पाणीपुरवठा होतो. सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आम्ही तपास केला असून त्या ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. पोलीस लाईन हा शेवटचा टप्पा असल्याने पाणी प्रेशर थोडेफार कमी असते. तसेच येथील टाक्या चौथ्या मजल्यावर असल्याने पाणी वर चढण्यास अडथळा होत आहे.- सूर्यकांत जमदाडे,उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा केंद्रदिवसातून सायंकाळी ४ ते ५ च्यादरम्यान कधी कधी पाणी येते. २० ते २५ मिनिटे पाणी असते. एवढ्या वेळात आम्हाला पाणी भरून घेता येत नाही. तसेच गेले सहा महिने झाले सर्व नागरिक इतर ठिकाणी पाणी भरण्यास जातात. दररोज टँकरचीसुद्धा सोय नसते. पाण्याच्या त्रासाची तक्रार करून नागरिक कंटाळले आहेत. महानगरपालिकेने यावर काहीतरी उपाय करावा. दिवसातून एकदा तरी ३, ४ तास आम्हाला पाणी मिळावे.- सुनीता सुपेकर, रहिवासी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई