शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 02:18 IST

पोलीसलाईनमधील नागरिकांची समस्या; पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांना नाहक त्रास

पुणे : पोलीस लाईन या भागात दोन, तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. ते पाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. असे त्या भागातील नागरिक म्हणत असून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी दररोज पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करीत आहेत. पाणी नक्की जिरते कुठे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.सोमवार पेठ येथील पोलीस लाईनमध्ये सर्व शासकीय कर्मचारी राहतात. त्या ठिकाणी एकूण चार मजल्याच्या आठ इमारती असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक इमारतीवर महापालिकेने बांधून दिलेली एक टाकी आहे. गेले सहा महिने झाले, येथील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. पाण्याची वेळ कधीही ठरलेली नसते. पाणी आले की अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. महिलांना पाणी नसल्याने परिसरातील आजूबाजूला पाण्यासाठी फिरावे लागते. घरातील पाण्याची कामे करण्यासाठी पाण्याची वाट बघावी लागते. पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नागरिकांनी नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली जात नाही. महानगरपालिकेने एक टाकी बांधून दिली होती. पण त्या टाकीचे पाणी पुरत नसल्याने नागरिकांनी आणखी टाकी बांधण्याची मागणी केली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सिंटेक्सच्या टाक्या बांधून देण्यात आल्या. परंतु या टाक्यांची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. त्यांना झाकण नसून फरशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कधी कधी अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच महापालिकेकडून चार ते पाच वर्षांनी टाकीची स्वच्छता केली जाते. पाणीपुरवठा कधी तरी झाला तरी पाण्याचे प्रेशर फारच कमी असते.यामुळे टाकी भरण्यास फारच वेळ लागतो. सायंकाळी पाण्यासाठी नागरिकांना या भागात खूप फिरावे लागते. नगरसेवक टँकरची सोय करून देतात. परंतु चारमजली इमारती असल्याने पहिल्या मजल्यावर पाणी घेऊन जाण्यास काही वाटत नाही. इतर वरच्या मजल्यावरील लोकांना पाणी तळापासून वर घेऊन जाण्यास खूप त्रास होत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये कुठलीही समस्या नाही. पण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. येथे राहणारे सर्व नागरिक शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आम्हाला तक्रार करायलासुद्धा भीती वाटते. तरीही आमच्या प्रभागातील नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली गेली नाही. पाण्याची ही गंभीर समस्या सोडवावी, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.ऋषीकेश रोकडे , रहिवासीपाण्यासाठी आंदोलन होत आहे. सोमवार पेठ पोलीस लाईनसहित, नाना पेठ, वायएमसीए, घोडमळा, किºहाडवाडा या सर्व ठिकाणी पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणीपुरवठ्याच्या कमतरतेमुळे मी टँकरची सोय करून दिली आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. आता मात्र सकाळच्या ११ ते २ या वेळेत पाणीपुरवठा होतो. सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आम्ही तपास केला असून त्या ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. पोलीस लाईन हा शेवटचा टप्पा असल्याने पाणी प्रेशर थोडेफार कमी असते. तसेच येथील टाक्या चौथ्या मजल्यावर असल्याने पाणी वर चढण्यास अडथळा होत आहे.- सूर्यकांत जमदाडे,उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा केंद्रदिवसातून सायंकाळी ४ ते ५ च्यादरम्यान कधी कधी पाणी येते. २० ते २५ मिनिटे पाणी असते. एवढ्या वेळात आम्हाला पाणी भरून घेता येत नाही. तसेच गेले सहा महिने झाले सर्व नागरिक इतर ठिकाणी पाणी भरण्यास जातात. दररोज टँकरचीसुद्धा सोय नसते. पाण्याच्या त्रासाची तक्रार करून नागरिक कंटाळले आहेत. महानगरपालिकेने यावर काहीतरी उपाय करावा. दिवसातून एकदा तरी ३, ४ तास आम्हाला पाणी मिळावे.- सुनीता सुपेकर, रहिवासी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई