शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

विहिरींची जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:53 IST

यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील विहिरींची जलपातळी खालावली आहे. महिनाभरात दीड मीटर पाणी घटल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : महिनाभरात दीड मीटरपर्यंत पाण्याने गाठले तळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील विहिरींची जलपातळी खालावली आहे. महिनाभरात दीड मीटर पाणी घटल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण होणार आहे.तालुक्यातील थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, किन्ही, मोई, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, कोल्हाकाळी, पांढुर्णा या ११ गावातील पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे. सार्वजनिक विहिरीमध्ये काहीसा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नळाला कुठे एक दिवसाआड, कुठे दोन दिवसाआड तर कुठे तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विहिरींसोबतच हॅण्डपंप, बंधारे, तळे यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी हा भाग अवर्षणप्रणय आहे. येथे गवळी समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांच्याकडे गोधन बऱ्याप्रमाणात आहे. पण, पाण्याअभावी त्यांचाही व्यवसाय अडचणीत आला आहे.रेड झोन, डार्क झोन, येलो झोन या तीन झोनमध्ये दुष्काळी व टंचाईग्रस्त गावे वाटल्या गेली आहे. त्यामुळे शासनाने या भागाला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी कामे करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियानातील तालुक्याती कमी गावे समाविष्ट केली. त्यामुळे यावर्षी निधी प्राप्त झाला नाही.भूजलपातळीत झालेली घट शेतकरी वर्गाला प्रचंड नुकसानीची ठरणारी आहे. संत्रा बाग, मोसंबी बाग, सिंचन करायला सुद्धा पाणी नाही. त्यामुळे अनेक गावात शेतकºयांनी बागा कापून टाकायला सुरूवात केली आहे. तालुक्यातील पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन शासनाने ताबडतोब कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आता शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.हिवाळ्यातच ११ गावांतील ३८ विाहिरी झाल्या कोरड्यापावसाअभावी जिल्ह्यात सर्वत्रच पाण्याचे भीषण वास्तव आहेत. आष्टी तालुका हा शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीरही केला आहे. या तालुक्यातील पाणी परिस्थिती लक्षात घेतली असता यावर्षी हिवाळ्यातच ११ गावांतील जवळपास ३८ विहिरींनी तळ गाठले आहे. या विहिरींना सप्टेंबर अखेरपर्यंत पाणी होते. परंतु जमिनीतील पाण्याची पातळी दीड मीटर खोल गेली आहे. त्यामुळे या सर्व विहिरींतील पाण्यांनीही तळ दाखवले आहे. यावरुन अगामी पाणी टंचाईचे संकेत मिळत असल्याने लवकरात लवकर यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.पंचाळा गावात गेल्या २५ वर्षापासून भीषण पाणीटंचाई आहे. या गावात एकमेव विहीर आहे. सर्व विहिरींनी तळ गाठले तरीही या विहिरीला पाणी असायचे. मात्र यावेळी अल्पसा जलसाठा असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.-श्रीराम मेहारे, सरपंचमोई या गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत संपुष्टात आले. बाराही महिने पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.पाणीपुरवठा योजना मंजूर झाली, पण काम व्हायचे आहे. यावर्षी पाण्याचा प्रश्न असून शासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.- पद्मा कुसराम, सरपंचआष्टी तालुक्यातील पाणी परिस्थिती बिकट असल्याने या पाणीबाणीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. विशेषत: या तालुक्यात गवळी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांचा दुग्ध व्यवसायही जोरात आहे. पण, पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयासह पिण्याचा प्रश्नही तोंड आवासून असल्याने दुग्ध व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे . तसेच शेती पिकांच्याही नुकसानीला समोरे जावे लागणार आहे.बांबर्डा व बोरखेडी गावात उंचावरील भाग असल्याने आताच पाणी नाही. शेतकरी शेतातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणत आहे. या गावांना प्रशासनाने टँकरद्वारे पुरवठा करण्याचा ठराव घेणार असून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी.- अर्चना नायकुजी, सरपंचथार व चामला गावात पाणीसाठा कुठेही शिल्लक नाही. शेतामधूनच सध्या पिण्यासाठी व वापरासाठी पाणी वापरल्या जात आहे. या गावात प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा.- वनीता केवटे, सरपंच

टॅग्स :Waterपाणी