शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:09 IST

देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे.

आळंदी - देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची सोय होण्याऐवजी गैरसोयच झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यातून येथील नियोजनावर भाविकांनी ताशेरे ओढले.तीन मार्च रोजी संत तुकाराम बीज सोहळा झाला. यानिमित्त आळंदी-देहूमध्ये राज्यातून भाविकांची मांदियाळी ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’चा नामजयघोष करीत हरिनामाच्या गजरात देवदर्शनासाठी आली होती. भाविकांच्या स्नानाची आळंदीत व्यवस्था होण्यासाठी इंद्रायणी नदीपात्रात आळंदी परिक्षेत्राच्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीदेखील सोडण्यात आले. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती उपनगराध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी याबाबत इंद्रायणी नदीपात्रात पाणी कमी झाल्याचा अहवाल मिळाल्याने मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. बीज सोहळ्याला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीत तीर्थक्षेत्री स्नानमाहात्म्य जोपासत स्नानदेखील केले. बीज झाल्यानंतर बंधाºयातून खाली पाणी सोडण्यासाठी खुले केलेले बर्गे (फळ्या) बंद न केल्याने संत तुकाराम बीजेला करण्यात आलेली सोय नंतर मात्र गैरसोय ठरली. यात केवळ नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करून आळंदी नगर परिषदेच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. बीज झाल्यानंतरच्या नियोजनाचा परिषद प्रशासनाला विसर पडल्याने गैरसोय वाढल्याचे भाविकांनी सांगितले.सध्या आळंदी येथे इंद्रायणी नदीपात्रात येणाºया पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाण्याचा निर्धारित साठा वाढल्याने बंधाºयातील पाणीपातळी वर आली. यामुळे बंधाºयातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून आल्याने सोय होण्याऐवजी आता गैरसोय होऊ लागली. जलपर्णी काढण्याची प्रक्रिया निविदेत अडकली असून, इंद्रायणी नदीपात्रावरील जलपर्णी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, इंद्रायणी नदीपात्राच्या दुतर्फा अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची चर्चा होत आहे.स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने इंद्रायणी नदीतील प्रवाह सतत वाहता असणे गरजेचे आहे. यासाठी पुणे पाटबंधारे विभागाकडे बंधाºयातून आळंदीकडे इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, पाणी आळंदीत आल्यानंतरच्या नियोजनाचा आळंदी नगर परिषद प्रशासनाला विसर पडला.संत तुकाराम बीज सोहळ्याला देहू येते येताना तसेच काही भाविक परतीच्या प्रवासात आळंदीत संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी दर्शनाला परंपरेने येतात. ‘श्रीं’चे दर्शन व तीर्थक्षेत्री स्नानाची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.बीजेपर्यंत जलपर्णीमुक्त असलेली इंद्रायणी बीजेनंतर मात्र पाण्याबरोबर वाहून आलेल्या जलपर्णीने युक्त झाल्यानेयेथे नागरिक व भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना स्नान करता आले नाही की पायावर पाणी घेता आले नाही. या गैरसोयीस आळंदीत त्यांना सामोरे जावे लागले.इंद्रायणी करणार जलपर्णीमुक्त : नगराध्यक्षा उमरगेकरतीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याबरोबर वाहून आलेली जलपर्णी बाहेर काढण्यात येईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. आळंदीतील पाण्याची पातळी खालावली होती. तुकाराम बीज सोहळ्याला भाविकांची सोय करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले होते. यामुळे भाविकांची स्नानाची सोय संत तुकाराममहाराज बीज दिनी ३ मार्च रोजीा झाली. त्यानंतर पाणी येतच राहिल्याने त्यारोबर महापालिकेच्या हद्दीतील नदीपात्रातून जलपर्णी आळंदीकडे खाली आली. यापुढील काळात जलपर्णीमुक्त इंद्रायणी नदीपात्र ठेवण्याचे नियोजन आहे. यासाठी निविदादेखील आल्या आहेत. लवकर प्रशासकीय कामकाज झाल्यानंतर जलपर्णी काढण्यात येईल. आळंदीतील नदीपात्र जलपर्णीमुक्त तसेच नदीचा परिसर दुतर्फा स्वच्छ, सुंदर करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :AlandiआळंदीAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषदPuneपुणे