शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रवाहाने रस्ता गेला वाहून

By admin | Updated: October 7, 2016 03:40 IST

कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे

कुरकुंभ : कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे पाण्याची साठवणूकसुद्धा झाली. परिणामी, शेतकऱ्यांना याचा उपयोग होत आहे. मात्र या पाण्याच्या प्रवाहाने पाणंद रस्त्यावरील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.कुरकुंभ येथील गिरमे वस्ती व जाधव वस्ती या परिसरात असणाऱ्या ओढ्यावरील मातीचा भराव वाहून गेला; परिणामी या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना यातूनच मार्ग काढत शेतीची कामे करावी लागतात. मात्र, अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत; तसेच ग्रामपंचायतीकडे याबाबत तोंडी चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शेतात जाण्यासाठी रात्री -अपरात्री या रस्त्याचा वापर करताना ओढ्यापलीकडे राहणारे नागरिक, विद्यार्थी, तसेच शेतकरी यामधून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.ओढा खोलीकरणामुळे पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाल्यामुळे परिसरातील विहिरी व शेतीसाठी याचा फायदा झाला; मात्र या झालेल्या कामाबाबतदेखील आक्षेप घेण्यात आला. काम झाल्यानंतर याची बिले काढण्यासाठी हेच लोक विरोध करीत आहेत व परत कामे करीत नाही, असा आरोप करतात. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी कामे करताना अडवणूक करण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या रस्त्याचे काम लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल .- जयश्री भागवत, सरपंच कुरकुंभ४या परिसरातील रस्ता वाहून गेला असल्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे. त्याचप्रमाणे या भागातून वाहतूक करणे, तसेच ये-जा करणेही जिकिरीचे झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडूनच तातडीने पावले उचलून हा रस्ता नव्याने तयार व्हावा, अशी सर्वांचीच मागणी आहे. ४एका बाजूला झालेल्या चांगल्या कामांविषयी शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. परंतु, दैनंदिन गरजेचा रस्ताच नसेल, तर अनेक कामे अडून राहतात. यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. प्रशासनाने लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.