शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

पाण्याचा वाद पुन्हा न्यायालयात, तीन व्यक्तींनी केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:21 IST

पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुणे : पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. उच्च न्यायालयाकडून पुणे विभागाच्या जलसंपदा विभागाला या संदर्भातील नोटीसही प्राप्त झाली आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील पाण्यावरून सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. पुण्याच्या पाण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. मात्र, पालिकेला १,१५० एमएलडी पाणी मंजूर असताना पालिका १,३५० एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे लक्ष्मण भोंडवे, प्रताप पाटील यांच्यासह आणखी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली.पुणे महापालिका व जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केले जात नाही, अशी तक्रार माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी प्राधिकरणाकडे केली होती. त्यावर प्राधिकरणाने पालिकेला केवळ मंजूर झालेले पाणी द्यावे; अधिकचे पाणी देऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे पंप बंद करून पाणी तोडण्याची कार्यवाही केली. परंतु, राजकीय दबाव वाढल्याने पाणीवितरणावर जलसंपदा विभागाने नरमाईची भूमिका घेतली. आता जलसंपदा विभागालाच न्यायालयात पालिकेच्या अधिकच्या पाणीवापराबाबत बाजू मांडावी लागेल.उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतलाखडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ग्रामीण भागाला उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भातील निर्णय जलसंपदा विभागाच्या कालवा समितीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याले धरणात गेल्या वर्षापेक्षा चार टीएमसीने पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही व्यक्तींनी न्यायालयात धाव घेतल्याचे बोलले जाते.