शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाण्याचा वाद पुन्हा न्यायालयात, तीन व्यक्तींनी केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:21 IST

पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुणे : पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. उच्च न्यायालयाकडून पुणे विभागाच्या जलसंपदा विभागाला या संदर्भातील नोटीसही प्राप्त झाली आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील पाण्यावरून सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. पुण्याच्या पाण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. मात्र, पालिकेला १,१५० एमएलडी पाणी मंजूर असताना पालिका १,३५० एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे लक्ष्मण भोंडवे, प्रताप पाटील यांच्यासह आणखी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली.पुणे महापालिका व जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केले जात नाही, अशी तक्रार माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी प्राधिकरणाकडे केली होती. त्यावर प्राधिकरणाने पालिकेला केवळ मंजूर झालेले पाणी द्यावे; अधिकचे पाणी देऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे पंप बंद करून पाणी तोडण्याची कार्यवाही केली. परंतु, राजकीय दबाव वाढल्याने पाणीवितरणावर जलसंपदा विभागाने नरमाईची भूमिका घेतली. आता जलसंपदा विभागालाच न्यायालयात पालिकेच्या अधिकच्या पाणीवापराबाबत बाजू मांडावी लागेल.उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतलाखडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ग्रामीण भागाला उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भातील निर्णय जलसंपदा विभागाच्या कालवा समितीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याले धरणात गेल्या वर्षापेक्षा चार टीएमसीने पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही व्यक्तींनी न्यायालयात धाव घेतल्याचे बोलले जाते.