शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकट?

By संजय पाठक | Updated: October 21, 2018 00:46 IST

यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प्रशासकीय खेळी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकमेव पुरेसा साठा असलेल्या गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी देण्याचे प्रयत्न सुरू असून, तसे झाल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देपाणी सोडणार : मराठवाड्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मनपा धारेवर

नाशिक : यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प्रशासकीय खेळी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकमेव पुरेसा साठा असलेल्या गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी देण्याचे प्रयत्न सुरू असून, तसे झाल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नेहरू अभियानाच्या वेळी महापालिकेने जे प्रकल्प नियोजित केले, त्यावर जलसंपत्ती प्राधीकरण म्हणजेच शासनाने जे आरक्षण मंजूर केले आहे, त्यानुसारच महापालिकेने यंदा आरक्षण मागितले असताना जिल्हाधिकाºयांनी शासनाचे आरक्षण अमान्य कारण्याचे कारण काय किंवा शासन निर्णय नाकरण्याचा अधिकार आहे काय? असा प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत.नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने दगा दिला असून, त्यामुळे सुमारे आठ तालुके अडचणीत आले आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात जेमतेम साठा चांगला आहे. परंतु त्यावरही मराठवाड्याची वक्रदृष्टी आहे. केवळ महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचाच त्यावर हक्क आहे असे नाही तर सिंचन प्रकल्प, एकलहरा अशी अन्य आरक्षणेदेखील त्यात आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २०) झालेल्या जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या पाणी आरक्षणाच्या बैठकीत केवळ महापालिकेला पाण्याचा वाढता वापर कसा काय अशी विचारणा करून धारेवर धरण्यात आले.महापालिकेला गेल्या तीन वर्षांपासून गंगापूर धरणातून ३९०० दश लक्ष घन फूट आरक्षण मिळत असून, महापालिकेने केवळ एक हजार अधिक म्हणजेच चार हजार दश लक्ष घन फूट आरक्षण मागितले अहो. याशिवाय दारणा धरणातून तीनशे दश लक्ष घन फूट, तर मुकणे धरणाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात प्रथमच शहराला पाणीपुरवठा होणार आहे. आरक्षणाच्या तुलनेत निम्म्या पाण्याच सुरुवातील होईल या अपेक्षेने महापालिकेने केवळ तीनशे दश लक्ष घन फूट आरक्षणच मागितले आहे, असे असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी महापालिकेला जाब विचारल्याने एक प्रकारे गंगापूर धरणातून पाणी आरक्षण कमी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटली आहे. विशेष म्हणजे गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असून, त्यासाठीच जिल्हाधिकारी खटाटोप करीत असल्याची चर्चा आहे.पाणीपुरवठ्यावर होणार परिणामगंगापूर धरण समूहातून दीड हजार टीएमसी पाणी सोडल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार असून, पाणीकपात करावी लागणार आहे. म्हणजेच ९७ गंगापूर धरण भरूनही नाशिककरांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई