शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जलसंधारणाची कामे निकृष्ट, पावसाच्या पाण्याबरोबरच निधीही गेला वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:38 IST

इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.

लासुर्णे - इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामांची व संबंधित वन विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यंदा सर्वत्रच पावसाने उच्चांक गाठल्याने इंदापूरच्या पश्चिम भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूरझाली होती.ही कामे इंदापूरच्या पश्चिमेस कळस, कडबनवाडी, बिरंगुडी आदी भागात झाली. परंतु, या भागातील वन विभागाच्या हद्दीत जलसंधारणाची सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.यामुळे डिसेंबर महिन्यातच या भागातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. एकाही बंधाºयात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांना अत्ताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात हीच परस्थिती भयानक होणार आहे.या वन विभागाचे अधिकारीच ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकारीच ठेकेदार झाला तर कामाला दर्जा मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.यामुळे वन विभागाने या इंदापूरच्या पश्चिम भागातील जलसंधारणाच्या सर्व कामाची व संबंधित अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.चौकशीची मागणीया भागातील जेथे जलसंधारणाची कामे झाली आहेत ती निकृष्ट झाली आहे. यामुळे या ठिकाणी साठलेले पाणीही वाहून गेले असूनत्यामुळे तेथील पावसाचे पाणी वाया गेले. यात शासनाचा कोट्यवधी रूपायांचा निधी वन विभागाच्या अधिकाºयांमुळे पाण्यात गेला आहे.यामुळे वन विभागाने या भागातील सर्व कामांची तसेच वन विभागाच्या अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या