शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 02:45 IST

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

पुणे : कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याआभावी जळून चाललेल्या दौंड, इंदापूर, बारामती भागातील शेतकरी सुखावणार आहेत. धरणातून ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाणार आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे खरीप हंगामासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करावे लागले होते. तसेच कालव्यातील लाखो लिटर पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. तर महिनाभर कालव्यातील पाणी बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्याने पेरलेली पिके जळून गेली. त्यामुळे कालवा दुरूस्तीची कामे तत्काळ करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात होती. अखेर रविवारी कालव्यातून सोडण्यात आले.जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयांनी कालवा परिसरातील नागरिकांना कालव्यातून पाणी सोडल्याची कल्पना दिली. तसेच कोणीही कालव्यात उतरू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जसे पाणी पुढे जाईल, तसे जलसंपदा विभागाचे कर्मचारीही पाण्याबरोबर जात होते. दुरूस्ती केलेल्या ठिकाणी थांबून कालव्या बाहेर जाते का? याची पाहणी करत होते.लष्करसाठी पाणी उचलणारकालवा बंद असल्यामुळे लष्कर भागातील नागरिकांना पिण्यासाठी पालिकेला पाणी उचलता येत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.परंतु, कालव्यात पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कालव्यातून २५० एमएलडी पाणी उचलले जाईल. सायंकाळी ६ वाजता ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडले असून रात्री दहा वाजता ५00 क्यूसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. - मनीषा शेकटकर,लष्कर व होळकर जलशुद्धीकरण केंद्रधरणसाठ्यात अडीच टीएमसी पाणी कमीपावसाने पाठ फिरवल्याने खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.त्यातच रविवारपासून कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरण साठ्यात आणखी घट होणार आहे.रविवारी खडकवासला धरणसाठ्यात २४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला,पानशेत,टेमघर,वरसगाव या धरणसाखळीत सध्या ८४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी ९२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.टेमघर धरणाच्या दुरूस्तीसाठी धरण रिकामे केले जात आहे.त्यामुळे धरणात ०.५७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून वरसगाव धरणात १२.७४,पानशेतमध्ये १०.४,तर खडकवासला धरणात १.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी धरणात २७.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.तर यंदा २८ आॅक्टोबर रोजी २४.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकPuneपुणे