शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 02:45 IST

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

पुणे : कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याआभावी जळून चाललेल्या दौंड, इंदापूर, बारामती भागातील शेतकरी सुखावणार आहेत. धरणातून ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाणार आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे खरीप हंगामासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करावे लागले होते. तसेच कालव्यातील लाखो लिटर पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. तर महिनाभर कालव्यातील पाणी बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्याने पेरलेली पिके जळून गेली. त्यामुळे कालवा दुरूस्तीची कामे तत्काळ करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात होती. अखेर रविवारी कालव्यातून सोडण्यात आले.जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयांनी कालवा परिसरातील नागरिकांना कालव्यातून पाणी सोडल्याची कल्पना दिली. तसेच कोणीही कालव्यात उतरू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जसे पाणी पुढे जाईल, तसे जलसंपदा विभागाचे कर्मचारीही पाण्याबरोबर जात होते. दुरूस्ती केलेल्या ठिकाणी थांबून कालव्या बाहेर जाते का? याची पाहणी करत होते.लष्करसाठी पाणी उचलणारकालवा बंद असल्यामुळे लष्कर भागातील नागरिकांना पिण्यासाठी पालिकेला पाणी उचलता येत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.परंतु, कालव्यात पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कालव्यातून २५० एमएलडी पाणी उचलले जाईल. सायंकाळी ६ वाजता ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडले असून रात्री दहा वाजता ५00 क्यूसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. - मनीषा शेकटकर,लष्कर व होळकर जलशुद्धीकरण केंद्रधरणसाठ्यात अडीच टीएमसी पाणी कमीपावसाने पाठ फिरवल्याने खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.त्यातच रविवारपासून कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरण साठ्यात आणखी घट होणार आहे.रविवारी खडकवासला धरणसाठ्यात २४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला,पानशेत,टेमघर,वरसगाव या धरणसाखळीत सध्या ८४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी ९२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.टेमघर धरणाच्या दुरूस्तीसाठी धरण रिकामे केले जात आहे.त्यामुळे धरणात ०.५७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून वरसगाव धरणात १२.७४,पानशेतमध्ये १०.४,तर खडकवासला धरणात १.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी धरणात २७.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.तर यंदा २८ आॅक्टोबर रोजी २४.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकPuneपुणे