शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

वारकरी रमले पिठलं-भाकरीच्या पाहुणचारात

By admin | Updated: June 22, 2017 07:19 IST

सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवत : सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या वेशीवर जाऊन स्वागत केले. विठ्ठल समाज भजनी मंडळाने पालखी सोहळ्याचे अभंग गात स्वागत केले. यानंतर मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चुलीवरील भाकरी व पिठल्याचे भोजन देण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी तब्बल एक लाख भाकरी व एक हजार किलोचे पिठले असे भोजन वारकऱ्यांना दिले. पिठले भाकरीच्या जेवणाची यवतमधील परंपरा अनेक वर्षे जुनी आहे.पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडीकृपाळू तातडी उतावेळा!!या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला. लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून आज सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पंढरीच्या वाटेतील मोठा टप्पा असलेल्या लोणी ते यवत दरम्यान जवळपास २८ किलोमीटर अंतराचा टप्पा पालखी सोहळ्याने ज्ञानोबा - तुकाराम जयघोष करीत पार केला.हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात पालखी सोहळा प्रवेश करताना दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, प्रांत अधिकारी संजय असावले, तहसीलदार विवेक साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, आप्पासाहेब पवार, तात्यासाहेब ताम्हाणे, तानाजी दिवेकर, पोपटराव ताकवणे, बोरिभडकच्या सरपंच कमल कोळपे, डॉ. अशोक रासगे, माऊली ताकवणे, सुरेश शेळके, गणेश कदम, नितीन दोरगे उपस्थित होते. पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपुर फाटा, जावजी बुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. जावजी बुवाची वाडी येथे पालखी अर्धा तास विश्रांती साठी थांबली होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यानंतर आरती करण्यात आली.तत्पूर्वी यवत येथे गावाच्या वेशीवर सरपंच राजिया तांबोळी, उपसरपंच समीर दोरगे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, भीमा पाटस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके, नानासाहेब दोरगे, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, सुभाष यादव, प्रकाश दोरगे, दशरथ खुटवड, शंकर दोरगे, कैलास दोरगे, दत्तोबा दोरगे, यांच्यासह ग्रामस्थांनी पालखी सोहक्याचे स्वागत केले.