शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:36 IST

‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला.

ठळक मुद्देआंबेगाववर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहाकार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावेसहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार

मंचर  : ‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला. या पराभवाला डॉ. कोल्हे जबाबदार नसून वळसे पाटील हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत होतात. मग वळसे पाटील का पराभूत होणार नाही, आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा,’’ असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच लांडेवाडी येथे येऊन आढळराव पाटील यांनी जनता दरबारात कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले,देशात मोदी लाट असताना शिरूरमधील पराभवाचे अनेकांना वाईट वाटले, तर काहींना आत्ताच पश्चाताप होतोय. १५ वर्षे जे बरोबर राहिले ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार मानत एका पराभवाने घरी बसणे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीची गुंडगिरी व दहशत वाढली असती. म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे. एका व्यक्तीच्या प्रतिमेचा, मालिकेचा प्रभाव व जातीच्या समीकरणामुळे निवडणुकीत पराभव झाला. मालिका पाहणाऱ्या महिलांनी राजाला मतदान करायचे, असे म्हणत समोरच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे वैयक्तिक कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यापूर्वीही मी थांबलो नाही व आताही थांबणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पाठवून सरकार तुमच्या पाठीशी असून कामांना प्राधान्य राहील, असे आश्वासन दिले आहे. आमदार सुरेश गोरे म्हणाले, की आढळराव पाटील यांचा या निवडणुकीत नैतिक विजय झाला आहे. मतदारांनी विकासापेक्षा प्रतिमेला महत्त्व दिले. कार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावे, दादा पुन्हा खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...........निवडणुकीत बैलगाडा, विमानतळ, वाहतूककोंडी हे प्रश्न बाजूला पडून केवळ जातीय समीकरणे व मालिका हा फॅक्टर चालला. यात माळी समाजाला दोष देऊन उपयोग नाही. ही पाच वर्षे अशी निघून जातील.४ महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार आहे.       - शिवाजीराव आढळराव पाटील........४जनता दरबार सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांबाबत तक्रार केली. निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले नसल्याने पराभव झाला, असे कार्यकर्ते सांगत होते. हा मुद्दा आढळराव पाटील यांनी खोडून काढला. मागील ३ निवडणुकांमध्ये जसे कार्यकर्ते काम करत होते, तसेच त्यांनी यावेळी केले आहे. ४त्यांना दोष देऊन उपयोग नाही. समोर अभिनेता उमेदवार असल्याने पराभव झाला आहे. इतरांवर दोष देण्यापेक्षा यापुढील काळात येणाºया विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना आढळराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल