शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:33 IST

महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे.

उरुळी कांचन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्नता असलेल्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे. याला प्रशासनाची ढिलाई म्हणायचे की संस्थाचालकांचे दुर्लक्ष? असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.या कॉलेजने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेचा निकाल अद्याप लावलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते सुटले किंवा नाही, याचा काहीच तपास विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांना लागेना. पण, कॉलेज प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र या कॉलेजमध्ये दिसून येत आहे. येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने ५ आॅक्टोबर २०१८ ते २६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत प्रथम वर्ष बीएसस्सी, बीए व बीकॉम या वर्गांच्या आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा घेतल्या असून, त्या परीक्षा घेऊन सुमारे २ महिने म्हणजे ६० दिवस उलटूनही निकाल अद्याप जाहीर केलेला नाही.ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील पालकांनी केली आहे.वास्तविक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारी २०१७ रोजी काढलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ कलम ८९ अन्वये प्रत्येक कॉलेज परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून ३० दिवसांत घोषित करण्याचा प्रयत्न करतील; मात्र कोणत्याही परिस्थितीत हा निकाल उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांत घोषित करील, असे म्हटले असताना अजूनही निकाल जाहीर नाहीत, यावरून या नियमाची पायमल्ली केली जात आहे असेच दिसते.ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते विषय सोडविण्यासाठी किंवा त्या विषयात पस होण्यासाठी विद्यापीठाने आॅक्टोबर बॅकलॉग ही एक संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली असते. या परीक्षेला बसून विद्यार्थी आपले मागील वर्षातील विषयात उत्तीर्ण होतात किंवा ते विषय सुटले, असे समजले जाते.कॉलेजच्या निकालाच्या विलंबाबाबत प्राचार्य रामदास रसाळ यांच्याकडे चौकशी केली असता, अजून निकाल लागले नाहीत याला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, निकाल कधी जाहीर केला जाईल, याची नेमकी तारीख न सांगता लवकरात लवकर तो लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कॉलेजचे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र १५ जूनला सुरू होणे अपेक्षित असताना ते ९ जुलै रोजी चालू केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीत येणारी सर्व महाविद्यालये वेळेवर म्हणजे १५ जून २०१८ पासून सुरू करण्याचे व दोन सत्रांतील महाविद्यालयाचे काम ३० एप्रिल २०१९ ला संपवायचे, अशा आशयाचे परिपत्रक २३/०४/२०१८ रोजी काढलेले परिपत्रक क्र. ६७ द्वारे त्यांच्याशी सलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना दिले असतानाही उरुळी कांचन येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय ९ जुलै २०१८ पासून म्हणजे तब्बल २२ दिवस उशिरा सुरू करून एक प्रकारे विद्यापीठाच्या नियमांची पायमल्लीच केली होती आता निकाल वेळेवर न लावल्याने पुन्हा एकदा तीच री ओढली गेली आहे.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र