शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत बहुजनांचा विराट मोर्चा

By admin | Updated: October 7, 2016 03:43 IST

रामती शहरात गुरुवारी (दि. ६) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बहुजन समाजाचा विराट क्रांती मोर्चा निघाला. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजातील बांधव लाखोच्या

बारामती : बारामती शहरात गुरुवारी (दि. ६) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बहुजन समाजाचा विराट क्रांती मोर्चा निघाला. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजातील बांधव लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कोपर्डीसह देशातील अन्य बलात्काराच्या घटनांमधील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करीत मोर्चा काढला.शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कसबा येथील शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील इंदापूर चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गुणवडी चौक, भिगवण चौक मार्गे मोर्चा मिशन हायस्कूलच्या भव्य मैदानावर स्थिरावला. या वेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात मागासवर्गीयांसह मुस्लिम, धनगर, आदींसह महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा तीव्र असतानादेखील मोर्चातील उपस्थितांची संख्या लक्षणीय होती. बारामतीसह राज्यात मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला. त्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायदासमर्थनार्थ बहुजन समाजबांधवांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी मराठा, धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी बहुजन समाजातील सर्वच संघटनांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. या मोर्चात बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण आदी परिसरांतील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. कोपर्डीतील घटना निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, इतर मागासवर्गीयांना या कायद्याच्या कक्षेत घ्यावे, मराठा, धनगर मुस्लिमांना आरक्षण मिळावे, कोपर्डीसह राज्यात त्यापूर्वी घडलेल्या बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, गोरक्षणाखाली होत असलेले अत्याचार थांबवावेत, मागासवर्गीयांचा नोकऱ्यांतील अनुषेश भरून काढावा, मागासवर्गीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशा मागण्या केल्या. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अ‍ॅट्रॉसिटीमध्ये साक्षीदारांची अट काढा...बहुजन रयत परिषदेचे आबासाहेब वाघमारे यांनी गावात वर्चस्व राखण्यासाठी दलितांना हाताशी धरून अ‍ॅट्रॉसिटीचा वापर उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी केला; मात्र अन्याय-अत्याचारांतून खऱ्या अर्थाने दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेतला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी करताना साक्षीदार कोणत्याही समाजाचे असले तरी चालतील, आरोपींना ९० दिवस जामीन मिळू नये अशा तरतुदी कराव्यात, अशी मागणी केली. एम. बी. मिसाळ, अशोक गायकवाड यांचीही भाषणे झाली. प्रतिमोर्चा नव्हे, मैत्री मोर्चा : वाघमारेरिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले, की कोणत्याही समाजाच्या विरोधात ‘प्रतिमोर्चे’ नाहीत, तर हा ‘मैत्री मोर्चा’ आहे. मात्र, कोपर्डीच्या प्रकरणाचा निषेध करीत असताना चुकीच्या पद्धतीने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची मांडणी केली जाते. खासदार असतानादेखील उदयनराजे भोसले हा कायदा रद्दच झाला पाहिजे, असे सांगतात. आता राजेशाही गेली, लोकशाही आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी कडक करावी. अ‍ॅट्रॉसिटीला विरोध जातीयवादी मानसिकतेतून : विजय गव्हाळेमोर्चाचे संयोजक अ‍ॅड. विजय गव्हाळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. अनेक वर्षे सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबविल्या नाहीत? गव्हाळे म्हणाले, की मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली; त्यामुळे महाराष्ट्रातील दलित समाजबांधवांमध्ये अस्वस्थता पसरली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यालाच लक्ष्य करून जातीयवादाला खतपाणी घातले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुलींना केलेली भाषणे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी होती. प्रस्थापित राजकीय नेतेच साखर सम्राट, दूध सम्राट आणि शिक्षण सम्राट आहेत. त्यांनीच शिक्षण महाग केले. या प्रस्थापितांना खऱ्या अर्थाने जाब विचारण्याची गरज होती. कुणबी मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला भविष्यात आरक्षणाची गरज भासेल, त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री असताना तरतूद करण्याच्या प्रयत्नाला त्या वेळच्या मराठा पुढाऱ्यांनी आरक्षणाच्या तरतुदीला विरोध केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात एकाच समाजाची ओरड आहे. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा. या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी केली.