विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 08:40 PM2020-01-09T20:40:25+5:302020-01-09T20:50:51+5:30

महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकतंय हेच पहायचं आहे अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. 

Vinayak Mete strongly criticized Maha vikas aghadi | विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले'

विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले'

Next

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकतंय हेच पहायचं आहे अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. 

मेटे यांनी गुरुवारी सारथी संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपस्थित माध्यमांशी संवाद साधला. या संस्थेत मेटे आले असता त्यांना अटेंड करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे मेटे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सारथी संस्थेच्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयालाही विरोध केला. ते म्हणाले की, ' सारथी संस्थेची आर्थिक स्वायत्तता पुन्हा बहाल करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला'. 

Web Title: Vinayak Mete strongly criticized Maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.