शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा - विनय हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 03:14 IST

मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.

पुणे -  मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) पारितोषिक वितरण समारंभ विनय हर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मसापचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘ग्राहकहित’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’ ‘वाघूर’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘अक्षरधारा’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘दक्षता’ या दिवाळी अंकाला, त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘बिगुल’ या दिवाळी अंकाला, ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘विद्यार्थी’ या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘चपराक’ या दिवाळी अंकातील विद्या बायास ठाकूर यांच्या ‘सुमी’ या कथेला तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘कलासागर’ या दिवाळी अंकातील शिरीष पदकी यांच्या ‘ग्रीक सॅलेड व ग्रेसच्या कविता’ या लेखाला विनय हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचविणे हे वितरक आणि विक्रेत्यांचे योगदान लक्षात घेऊन पूनम एजन्सी, संदेश एजन्सी, रोहिणी बुकडेपो, उत्कर्ष आणि रसिक या प्रमुख विक्रेते व वितरकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.वि. दा. पिंगळे यांनीप्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. उद्धवकानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.दिवाळी अंक व्यापक व्हायला हवाहर्डीकर म्हणाले, दिवाळी अंक ही केवळ साहित्यिकांची मिरासदारी नाही. साहित्याचे वर्तुळ मर्यादित आहे, ते व्यापक होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकात लेखक बांधिलकी म्हणून लिहितात, संपादक बांधिलकी म्हणून अंक काढतात या पलीकडे जाऊन अर्थकारणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकांत तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहीत असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे