शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:10 IST

नायगाव, पांडेश्वरमध्ये आज होणार बैठक, हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्याची जागा निश्चित झालेली नाही. विमानतळ बाधित क्षेत्रात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना असल्याने या ठिकाणचा शेतकरी ऊसशेती पिकवू लागला आहे. 

सोन्यासारख्या जमिनीवर विमानतळाचे भूत बसल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी हैराण झाला आहे. याविरोधात येथील गावे एकत्र आले असून जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाला नायगाव, पांडेश्वर येथे ही बैठक होणार आहे. जमीन न देण्याचा एकमुखी ठराव ही गावे करणार आहेत. पुरंदर विमानतळाविरोधात येथील गावे एकवटली आहे. कितीही  किंमत मोजावी लागली, तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा बैठकीत निर्णय करुन विमानतळ विरोधी घोषणा देण्यात आल्या. हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यातील नियोजीत विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत. व विमानतळाला विरोध केला जात आहे.  कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे विमानतळ होऊन द्यायचे नाही. जमिनी द्यायच्या नाहीत या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील नियोजित सात गावांतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत बदल करून पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर व आसपासच्या परिसरात विमानतळ हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी नायगाव व पांडेश्वर येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी विमानतळ आमच्याकडे नकोच, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी जबरदस्तीने विमानतळासाठी बळकावून आम्हाला भकास करू नका. असा सूर येथील शेतकऱ्यांनी लावला आहे. 

सर्वपक्षीय कार्यकर्ते राहणार उपस्थित २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पूर्व भागातील विमानतळबाधित सर्व गावांची बैठक नायगाव येथील सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच या बैठकीला सर्व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना बोलवणे. व त्यांची विमानतळ विषयी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचे ठरले आहे. जागा निश्चित न झाल्याने पुरंदर तालुक्यातील विनामतळाला पुन्हा विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. तर खेड तालुक्यात विरोध मावळत आहे. बारामतीच्या विकासाठीच हे विमानळ पुरंदरला होत असल्याचा आरोप होत आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळ