शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अंमलबजावणीवाचून 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' थंडावली; चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:47 IST

यामुळे तालुक्यात दुर्घटना, चोऱ्या, दरोडे, शॉर्टसर्किटने उस जळून खाक होणे, अशा घटना वाढू लागल्या आहेत (gram suraksha yantrana baramati)

-अविनाश हुंबरे

सांगवी (बारामती): दूरवर असणारे गाव व पोलीस ठाणे अशातच रात्री-बेरात्री एखाद्या वाडी-वस्तीवरच्या घरावर अचानकपणे पडणारा दरोडा अथवा एखादा आपत्कालीन प्रसंग रोखण्यासाठी होणारा विलंब, अशा वेळी लोकांच्या मनात असुरक्षितता माजलेली असते. मात्र, या दुर्घटना व दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी गावातील लोकांकडूनच तातडीची मदत मिळवण्यासाठी गावागावात एक प्रभावी माध्यम कार्यान्वित करण्यात आलं. ते म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणा, मोबाईलवरून फक्त एक फोन केला की वायरलेसद्वारे सर्व घटनेची माहिती मिळताच अख्खा गाव जागं करणारी ही यंत्रणा मात्र, बारामती सारख्या ठिकाणी अंमलबजावणी वाचून थंडावली आहे.

यामुळे तालुक्यात दुर्घटना, चोऱ्या, दरोडे, शॉर्टसर्किटने उस जळून खाक होणे, अशा घटना वाढू लागल्या आहेत. एखाद्या घटनेला दुर्घटनेत रूपांतर न होऊ देता दरोडे, चोऱ्या, दुर्घटना, उसाला आग लागणे, सर्प दंश, नदीत कोणी बुडणे, अपघात, महिला छेडछाड, गुन्हे, अशा एक ना अनेक आपत्कालीन घटना रोखण्यासाठी व घटनाग्रस्ताला गावातील नागरिक, पोलिस यांना एकाच वेळी सतर्क करून मदत कार्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, सध्या बारामतीत ही यंत्रणा झोपली आहे. यामुळे चोऱ्या, दरोडे यांसारखे प्रमाण वाढले आहे. गावागावात एकदा बैठक घेतल्यानंतर पुन्हा प्रात्यक्षिक बैठका झाल्याच नाहीत. सध्या गावागावात यंत्रणेत सर्व कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल क्रमांक समाविष्ट झाले असले तरी अनेकांना या यंत्रणेविषयक प्रात्यक्षिके पाहायला न मिळाल्याने ही यंत्रणा अंधारातच आहे. 

दुर्घटना अथवा चोरी, दरोडे यासाठी मदत कार्य मिळण्यासाठी गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक मोबाईल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी १८००२७०३६०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास एकाच वेळी संबधीत पोलीस ठाण्यासह हजारो क्रमांकावर संपर्क करण्याची यंत्रणा जोडली आहे. काेणत्याही कुटुंबातील कोणताही सदस्य संकटात असेल तर त्याला या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळणे सोयीचे व्हावे, हा या यंत्रणेचा हेतू आहे.

सुरुवातीच्या काळात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे बारामती तालुक्यात चोरी होण्यापासून अनेक घटना रोखल्या गेल्या. मात्र, सध्या बारामती तालुक्यात याचा प्रभावी वापर होताना दिसत नाही. यामुळे चोरीच्या घटनांत वाढ झाली. एक वर्षा पूर्वी दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून बारामतीत सर्व पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन या यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवून यंत्रणेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक गावात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली होती. त्यानंतर विशेष अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपलेली जबाबदारी झटकल्याचे चित्र समोर आले 

संकटकाळी दुर्दैवी घटना रोखण्यासाठी व परिसरात जलदगतीने दुर्घटना, दरोडे, चोऱ्या अशा घटनांना वेळीच आळा बसण्यासाठी तालुक्यात ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना योग्य प्रशिक्षण देऊन ग्राम सुरक्षा यंत्रणे विषयक तालुक्यात जागृता केली जाणार आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वीडियो क्लिप व मेसेजद्वारे लोकांच्यात जनजागृती करून ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरा संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. -गणेश इंगळे  (उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती)

टॅग्स :BaramatiबारामतीSangviसांगवीPuneपुणे