शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

भारतीय राजकारणी समाज कॅन्सरपीडित : विक्रम गोखले; पुण्यात वीर जीवा महाले पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 14:57 IST

भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात केली.

ठळक मुद्देहिंदू हा धर्म नाही तर संस्कृती, ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते : विक्रम गोखले तरुणांनी देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा : एस. के. अंबिके

पुणे : भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. हे भारतासाठी फारच त्रासदायक असून या राजकारणाला असे वाईट कृत्य करण्याचा कॅन्सर झाला आहे व पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर केली. नातूबाग मैदान येथे शिवप्रताप दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार कोल्हापूरचे बजरंग दल प्रमुख संभाजी साळुंखे यांना देण्यात आला. यावेळी माजी आमदार अशोक मोडक, डॉ. एस. के. अंबिके, तरुण शिवव्याख्यानकार सौरभ कर्डे, समस्त हिंदू आघाडी कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते. तसेच हिंदू शौर्य पुरस्कार मालेगाव हिंदू आघाडी समाजसेवक मच्छिंद्र शिर्के यांना देण्यात आला. गोखले पुढे म्हणाले, की सत्ता टिकवून ठेवणे, आमची बाजू कोणती तुमची बाजू कोणती अशा गोष्टी राजकारणात सतत घडत आहेत. तरुणांनी देशाच्या राजकारणात सहभागी होण्याचा विचार केला नसेल तर त्यांनी राजकारणाचे भान ठेवावे आणि राजकारणाचा भाग म्हणून रहावे. तुम्ही घरात बसून, टाळ्या वाजवून, मोबाईल हातात घेऊन फिरत बसण्यापेक्षा देशाच्या भविष्याचा विचार करावा. सर्वांनी शरीराने, मनाने, विचाराने मजबूत व्हा. तुमच्या नजरेतून शत्रू पळाला पाहिजे. हिंदू हा धर्म नाही तर ही संस्कृती आहे. ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते. शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात नव्हते तर ते आपल्या देशाच्या, स्वराज्याच्या, मातीच्या जो विरुद्ध जाईल त्यांच्याशी लढले. जगातील एकमेव संस्कृती ही हिंदू आहे तिचा अभिमान ठेवा.मोडक म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने हिमालय ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारतभर आपला ठसा उमटवला आहे. तरीसुद्धा आपल्या राजधानीमध्ये अफजलगुरु सारख्यांची आरती होते, हा भारताला लागलेला काळिमा आहे.  अंबिके म्हणाले, की महाराष्ट्रातल्या तरुणांनी आर्मी, एअरफोर्समध्ये सामील व्हावे. आणि देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा. कार्यक्रमात पोवाडा गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकिशोर एकबोटे यांनी केले.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेPuneपुणे