शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राजकारणी समाज कॅन्सरपीडित : विक्रम गोखले; पुण्यात वीर जीवा महाले पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 14:57 IST

भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात केली.

ठळक मुद्देहिंदू हा धर्म नाही तर संस्कृती, ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते : विक्रम गोखले तरुणांनी देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा : एस. के. अंबिके

पुणे : भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. हे भारतासाठी फारच त्रासदायक असून या राजकारणाला असे वाईट कृत्य करण्याचा कॅन्सर झाला आहे व पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर केली. नातूबाग मैदान येथे शिवप्रताप दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार कोल्हापूरचे बजरंग दल प्रमुख संभाजी साळुंखे यांना देण्यात आला. यावेळी माजी आमदार अशोक मोडक, डॉ. एस. के. अंबिके, तरुण शिवव्याख्यानकार सौरभ कर्डे, समस्त हिंदू आघाडी कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते. तसेच हिंदू शौर्य पुरस्कार मालेगाव हिंदू आघाडी समाजसेवक मच्छिंद्र शिर्के यांना देण्यात आला. गोखले पुढे म्हणाले, की सत्ता टिकवून ठेवणे, आमची बाजू कोणती तुमची बाजू कोणती अशा गोष्टी राजकारणात सतत घडत आहेत. तरुणांनी देशाच्या राजकारणात सहभागी होण्याचा विचार केला नसेल तर त्यांनी राजकारणाचे भान ठेवावे आणि राजकारणाचा भाग म्हणून रहावे. तुम्ही घरात बसून, टाळ्या वाजवून, मोबाईल हातात घेऊन फिरत बसण्यापेक्षा देशाच्या भविष्याचा विचार करावा. सर्वांनी शरीराने, मनाने, विचाराने मजबूत व्हा. तुमच्या नजरेतून शत्रू पळाला पाहिजे. हिंदू हा धर्म नाही तर ही संस्कृती आहे. ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते. शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात नव्हते तर ते आपल्या देशाच्या, स्वराज्याच्या, मातीच्या जो विरुद्ध जाईल त्यांच्याशी लढले. जगातील एकमेव संस्कृती ही हिंदू आहे तिचा अभिमान ठेवा.मोडक म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने हिमालय ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारतभर आपला ठसा उमटवला आहे. तरीसुद्धा आपल्या राजधानीमध्ये अफजलगुरु सारख्यांची आरती होते, हा भारताला लागलेला काळिमा आहे.  अंबिके म्हणाले, की महाराष्ट्रातल्या तरुणांनी आर्मी, एअरफोर्समध्ये सामील व्हावे. आणि देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा. कार्यक्रमात पोवाडा गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकिशोर एकबोटे यांनी केले.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेPuneपुणे