शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन ७ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:06 IST

पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात.

पुणे - पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. यापुढील काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करुन ती पडताळणी ५ ते ७ दिवसांत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी दिली.विदिशा विचार मंचाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पासपोर्ट प्रक्रियेसंदर्भातील बदलांविषयी मुळे म्हणाले, पासपोर्र्ट मिळ्ण्यात मोठी अडचण ही पोलीस पडताळणीची आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेने कितीतरी पुढे आहेत. नगरमध्ये नुकतेच १८० वे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले. एप्रिल अखेर देशात २५१ कार्यालये सुरु होणार आहेत. भविष्यात पासपोर्ट कार्यालयात न जाता घरी पासपोर्ट मिळेल अशा तंत्रज्ञानाचा विचार करण्यात येणार आहे. अजूनही १२५ कोटींपैकी केवळ ५ ते ६ कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे. हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय यावर विशेष लक्ष देणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.निवृत्तीनंतर डॉ. मुळे राजकारणात?डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये डॉ. मुळे निवृत्त होत असून, निवृत्तीनंतर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता, डॉ. मुळे म्हणाले की, सध्या तरी मी सरकारी नोकरीत आहे. समाजातील चांगल्या क्षेत्रातील लोकांनी राजकारणात यायला हवे. याचा अर्थ, मी राजकारणात उतरणार नाही, असे नाही.

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारत