शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेलवळी गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी संपर्क तुटला आहे. येथील तीस ते चाळीस कुटुंबांची दळणवळणाची सोय नसल्याने उपासमार होऊ नये, यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

भोरगिरी परिसरातील डोंगरावर असलेले वेलवळी गाव भीमा नदीच्या पलीकडे असल्याने या गावात कुठलाही विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही, शाळा नाही, आरोग्य केंद्राचा कुणी कर्मचारी फिरकत नाही, अशा परिस्थित गावकरी दळणवळणासाठी या एकमेव रस्त्यावर अवलंबून असतात. विशेष म्हणजे हा रस्ता पायथ्याशी संपतो. तेथुन पुढे एक तास पायपीट करत डोंगर चढुन गावात पोहोचता येते. अतिवृष्टीमुळे चिखल व पूर यामुळे ही आदिवासी वस्ती संकटात सापडली आहे. या गावाला तातडीने प्रशासनाने मदत करावी अशी, मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. पुलाच्या भरावाचे काम तातडीने न झाल्यास ऐन पावसाळ्यात अन्न धान्या बरोबर आरोग्याच्या मोठा प्रश्न वेलवळीकरांपुढे आहे.

फोटो : वेलवळी (ता. खेड) येथील भीमा नदीला जोडणाऱ्या रस्तावरचा पुलाचा वाहून गेलेला भराव.