शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर; फळभाज्या किलोला ८० रुपयांपेक्षा जास्त महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:46 IST

भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेला असून, किरकोळ बाजारात शेवगा आणि मटार तब्बल १६० रुपये किलो दर झाले आहे. तर भेंडी, टॉमेटो, वांगी सर्वंच फळभाज्या ८० च्या घरात गेल्या आहेत.

पुणे : भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेला असून, किरकोळ बाजारात शेवगा आणि मटार तब्बल १६० रुपये किलो दर झाले आहे. तर भेंडी, टॉमेटो, वांगी सर्वंच फळभाज्या ८० च्या घरात गेल्या आहेत. कोथिंबीर ७० रुपये गड्डी व अन्य भाज्यांनी २० ते २५ रुपयांचा आकडा गाठला आहे. वाढलेल्या दरामुळे भाज्यांची खरेदी ‘नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांनावर आली आहे.परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या भाज्यांची बाजारात आवक होत आहे त्याचा दर्जा चांगला नाही. हलक्या प्रतीच्या मालाला ग्राहकांकडून मागणी नाही. चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमी असल्याने फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळेच घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दरात मोठी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना वाढलेल्या दराचा फटका बसत आहे.घाऊक बाजारात पालेभाज्यांची विशेषत: जिल्ह्यातून आवक होत आहे. मात्र फळभाज्यांची आवक राज्य आणि परराज्यांतून होत आहे. बाजारात रोज ८० ते १०० ट्रक भाज्यांची आवक होत आहे. आवक वाढल्यानंतर किरकोळ बाजारात १० रुपयात पावभर मिळणाºया भाज्या आता कमीतकमी २० रुपये पावशेर झाल्या आहेत. दरात दुपटीने वाढ झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे. पालेभाज्यांचे दरही तेजीत आहेत. चांगली कोथिंबीर ७०, मुळा ३०, मेथी २०, पालक २०, चाकवत २० आणि अंबाडीच्या गड्डीचे दर २० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.किरकोळ बाजारात ग्राहकांची मागणी पूर्वीप्रमाणेच आहे. मात्र चांगल्या प्रतीच्या मालाची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक वाढल्यास दरात घट होईल. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत भाज्या उपलब्ध होत नाहीत. मुळात चांगल्या प्रतीच्या मालाचे घाऊक बाजारातच दर वाढले आहेत. त्याचा किरकोळ बाजारावर परिणाम झाल्याचे विक्रेते अभिषेक गावडे यांनी सांगितले.किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दरभाजी दर (किलो)मटार १६० रुपयेशेवगा १६० रुपयेकोथिंबीर ७० रुपये (गड्डी)भेंडी ८० रुपयेटोमॅटो ८० रुपयेवांगी ८० रुपयेभाजी दर (किलो)गवार ८० रुपयेफ्लॉवर ८० रुपयेकोबी ८० रुपयेकारली ८० रुपयेदोडका ८० रुपयेसिमला मिरची ८० रुपये

टॅग्स :Puneपुणे