शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे पिसोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST

पिसोळीकरांना हवाय एसटीपी, क्रीडांगणासाठी जागा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळीतले वाढते शहरीकरण पाहता आता लोकसंख्येनुसार मुबलक ...

पिसोळीकरांना हवाय एसटीपी, क्रीडांगणासाठी जागा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पिसोळीतले वाढते शहरीकरण पाहता आता लोकसंख्येनुसार मुबलक पायाभूत सुविधांची आवश्यकता गावाला आहे. क्रीडांगण, मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प (एसटीपी) आदी सुविधा विलिनीकरणानंतर मिळाव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

गावात कचरा व्यवस्थापन यंत्रणा नाही. ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या कचरा उचलतात, तरीही गावात चोहीकडे कचरा साचलेला असतो. कचरा जाळला जात असल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने यात लक्ष घालावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय असून ती जीवघेणी ठरणारी आहे. त्यातून निघणाऱ्या धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक अपघात घडतात. प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. भूमिगत गटारांची कामे झाली पण सगळे सांडपाणी उघड्या जागेवर सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी ड्रेनेज फुटले असून सांडपाणी रस्त्यावर वाहून जात आहे. त्यामुळे विकासही नाही आणि अनारोग्य अशा दुहेरी कात्रीत गावकरी सापडले आहेत.

मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका आल्यानंतर ती काढली जातील अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. गावात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान नाही, खेळण्यासाठी मैदान नाही. या सुविधा महापालिकेने द्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

कोट

“गावाची लोकसंख्येनुसार गावाला मुबलक पाणीपुरवठा महापालिकेकडून व्हावा. गावातील वाढती लोकसंख्या पाहता रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे. तोपर्यंत कर आकारणी करू नये.”

- दीक्षा निंबाळकर, सरपंच

कोट

“पिसोळीत २० वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. शेजारी गावातून पाणी विकत आणावे लागते. महापालिकेने पाण्यासोबतच इतर पायाभूत सुविधांचा विकास करावा.”

-तानाजी काळभोर, माजी सरपंच

फोटो ओळी

ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या जागेचा वापर खासगी इमारतीच्या बांधकामासाठी होत असून येथील राडारोड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.