शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

भावजयीच्या अंतिम क्रियाकर्मासाठी वरवरा राव यांचा तात्पुरता जामीन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 21:26 IST

राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आता घरात वरवरा राव हे मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसापर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

 पुणे : भावजयीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन मिळावा असा अर्ज विद्रोही कवी आणि लेखक वरवरा राव यांनी युएपीएच्या (बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली) विशेष न्यायालयात केला आहे. राव यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. 

 राव यांना सोमवारी भावजयीचे निधन झाल्याची माहिती मिळाली. राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आता घरात वरवरा राव हे मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसापर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अन्यथा एस्कॉटच्या (पोलिस बंदोबस्तात) उपस्थितीत धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी लागणा-या खर्चाची जबाबदारी अ‍ॅड. राव हे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.  

पेड्डा कर्मा (धार्मिक विधी) मध्ये दहाव्या दिवसाला महत्व असून त्याला दशा दिन कर्म असे संबोधले जाते. या विधींसाठी अ‍ॅड. राहुल देशमुख आणि अ‍ॅड. पार्थ शहा यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत तपास अधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील यांना न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास सांगितले असून अर्जावरील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे

टॅग्स :Courtन्यायालय