शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

रांगोळीतून दिले जातेय विविध सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

रांगोळी काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना आणि रंगसंगतीचे ज्ञान नसताना देखील सकारात्मक ऊर्जेने भारावून गेलेल्या अक्षदा बाबेल यांनी ...

रांगोळी काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना आणि रंगसंगतीचे ज्ञान नसताना देखील सकारात्मक ऊर्जेने भारावून गेलेल्या अक्षदा बाबेल यांनी रांगोळ्या काढायला सुरुवात केली. दररोज एक वेगळी रांगोळी काढली जाऊ लागली. रोजच्या सरावातून विविध रांगोळ्यांचा जन्म झाला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, लेक वाचवा, लेक शिकवा, एड्स, व्यसनमुक्ती, आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, पाणीबचत व भारतीय सण इतर अनेक प्रासंगिक रांगोळ्या काढल्या गेल्या.

रांगोळी काढताना मनातील तणाव कसा नाहीसा होत होता हे देखील कळत नव्हते. त्यामुळे मनातील नकारात्मक भावना जाऊन, दुसऱ्या दिवशी कोणती अधिक चांगली रांगोळी काढता येईल याचा विचार अक्षदा बाबेल यांच्या मनात येऊ लागला. कोरोनाच्या बातम्यांचा मनावर होणारा वाईट परिणाम जाऊन आपण काहीतरी सकारात्मक करू शकतो याची जाणीव त्यांना पदोपदी झाली व यातूनच समाजप्रबोधन करण्याचा त्यांनी संकल्प केला. व्हॉट्सअॅप स्टेटसवर, फेसबुकला अपलोड केलेली रांगोळी अनेकांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवली. या रांगोळ्यांचा अनेकांनी आनंद घेतल्याने अक्षदा बाबेल यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपण जर आपल्यातील कला जोपासली तर आपण नक्कीच नकारात्मक विचार बाजूला सारू शकतो. अनेकांनी आपल्या मनातील आवाज ओळखून एखादी कला जोपासावी व मनामध्ये सकारात्मक विचार ठेवावे हीच भावना यातून मी व्यक्त करत आहे. स्वतः आनंदी राहण्यासाठी, मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी प्रत्येकाने सध्याच्या काळात एखादी तरी कला जोपासणे गरजचे आहे.

अक्षदा रतिलाल बाबेल,

नारायणगाव

१३ खोडद

१३ खोडद १