शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

#Valentine special : जगाच्या नाकावर टिच्चून लग्न करणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी जोडप्याची कहाणी आवर्जून वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:21 IST

'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत .

पुणे : 'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत. ही कहाणी आहे माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांची. यातली माधुरी तृतीयपंथी आहे. त्यामुळे त्यांची कहाणी वेगळी ठरत नाही पण त्या दोघांनी अधिकृत आणि विधिवत लग्न करून आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातील पहिल्या तृतीयपंथी वैवाहिक जोडप्याचा मान या जोडप्याला मिळाला आहे. या जोडप्याची कथा एखाद्या चित्रपटासारखी उत्कंठावर्धक आहे.

            माधुरी पूर्वी अनेक स्टेज शो करायची. लावणी, कथक नृत्य हा तिचा हातखंडा. हे सर्व सुरु असताना सगळ्यांच्याप्रमाणे तिचेही फेसबुक अकाउंट होते. त्यातही तिने स्वतःची ओळख कधीही लपवली नाही. अचानक तिच्या इनबॉक्समध्ये महाराष्ट्र- गुजरात सीमेजवळ राहणाऱ्या जय शर्मा या तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती एक्सेप्ट केली आणि गप्पांचा सिलसिला सुरु झाला. एक दिवस त्याची परीक्षा घेण्यासाठी तिने त्याला मुंबईत बोलावलं आणि अवघ्या दोन तासात कशाचीही पर्वा न करता तो आला. फेसबुकावरची मैत्री बहरत होती आणि एक दिवस त्याने विचारलं ' आपण कायम सोबत राहू शकतो का ?' ती म्हणाली, ' हो पण अधिकृत लग्न करूनच ! त्याने  क्षणाचाही विचार केला नाही आणि म्हणाला 'हो करूया'

            लग्न करण्याचं तर ठरवलं पण बैठक चालली ती पाच तास. का लग्न करायचं आहे, ती तृतीयपंथी आहे, हा नॉर्मल आहे मग हे नातं कशासाठी असे हजारो सवाल समोर येत होते. त्याचे मित्र तर तूला मुली मिळतील मग एका हिजड्याशी लग्न कशासाठी असं समजावत होते. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. त्यामुळे अखेर सगळ्यांची समजूत काढत त्यांनी लग्न केलं आणि एक गोड प्रेमकहाणी अधिकृत झाली. लग्न झाल्यावर त्यांच्यावरची संकट संपली नव्हती. माधुरीचे सत्य जय यांच्या आईंना त्यांनी सांगितले नव्हते. जुन्या विचारात आणि वातावरणात वाढलेल्या त्या हे स्वीकारणार नाहीत म्हणून सारे साशंक होते. योग्य वेळी आणि सुरळीत संसार सुरु झाल्यावर त्यांना हे सांगू असे दोघांनी ठरवले पण लग्नाची बातमी जगभरातल्या माध्यमात प्रसिद्ध झाली आणि सत्य समोर आले. त्यानंतर सुमारे सहा महिने दोघेजण घरातल्यांसोबत संवादाचा प्रयत्न करत होते. हो- नाही करत अखेर तेही मानले आणि माधुरी शर्मांची सून झाली.           या सगळ्या घटनेला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. वरकरणी हे सोपं दिसत असलं तरी मानसिकता बदलवणं कठीण होत. या साऱ्या काळातून तावून सुलाखून निघालेले माधुरी आणि जय आता प्रचंड खुश आहेत. व्हॅलेंटाईन डे'वर बोलताना ते म्हणतात, 'आमच्यानंतर देशात आठ ओपन मँरेज झाली. तुम्ही प्रेम केल्यावर जात, धर्म, लिंग अशा गोष्टींना काही महत्व नसते. व्हॅलेंटाईन दिवस तर बहाणा आहे. प्रत्येक जोडप्याने रोजचा दिवस साजरा करण्याची गरज आहे. विशेषतः समाजाने स्वीकारले, प्रेम दिले तर कोणीही किन्नर भीक मागायला जाणार नाही'. 'एक दुजे के लिए' बनलेल्या या जोडप्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेTransgenderट्रान्सजेंडरmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट