शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

वाटाणा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:40 IST

पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले असून, पुरंदरच्या पूर्व भागात पिसर्वे, पारगाव, राजुरी, नायगाव, रिसे-पिसे आदी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे.

नारायणपूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले असून, पुरंदरच्या पूर्व भागात पिसर्वे, पारगाव, राजुरी, नायगाव, रिसे-पिसे आदी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकºयांनी पिकांच्या पेरण्याच केल्या नाहीत. यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.यावर्षी चांगला पाऊस येईल, धान्य मिळेल, रोगराई कमी होईल भाकणुकीमध्ये सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या आशेने अनेक शेतकºयांनी खरीप हंगामाची जोरात तयारी केली होती. मार्च महिन्यात संपूर्ण देशात शेतकºयांनी कर्जमाफी लावून धरली असताना पाऊस चांगला पडेल, अशी भविष्यवाणी ऐकल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकºयांनी मात्र कर्जमाफीऐवजी स्वत: कर्ज काढून बँकेत कर्ज भरले.३१ मार्चपूर्वीच शेतकºयांनी आपला सातबारावरील बोजा कमी करून पुन्हा कर्ज काढले. शेतीची मशागत करून बी-बियाणे, खते, औषधे घेतली; मात्र पुन्हा कर्ज होऊनही हातात काहीच पडत नाही, अशी चिन्हे दिसत असल्याने यावर्षीसुद्धा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तसेच शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे.सध्या अनेक ठिकाणी खुरपणी सुरू आहे; मात्र त्यानंतर सलग पुढील नक्षत्रांमध्ये पावसाने फारसी प्रगती केली नाही. त्यामुळे उगवून आलेले वाटाणा पीक सर्वत्र धोक्याची घंटा मोजत आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील महत्त्वाची असणारी बाजरी, भुईमूग, इतर कडधान्ये ही सर्वच पिके अडचणीत आली आहेत. ज्या विहिरींना बºयापैकी पाणी आहे, त्या शेतकºयांकडे पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर संच आहे. ते शेतकरी पाऊस नसल्याने किमान स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. तसेच सध्याच्या स्थितीमध्ये पावसाने जास्त ताण दिल्यास हातामध्ये आलेली सर्वच पिके नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत....तर पीक फुलोºयात असतेदरवर्षी याच दिवसात वाटाणा पिकांना फुले आलेली असतात. तर काही ठिकाणी वाटाणा पिकाला शेंगा येऊन दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. मात्र, या वर्षी पावसाने मोठा ताण दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे.मागील वर्षी वाटाण्याला अजिबात बाजारभाव चांगला मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी घरीच बियाणे तयार केले. तसेच दरवर्षीपेक्षा यावर्षी बियाणालाही बाजारभाव कमी असल्याने प्रत्येक शेतकºयाने ४० किलोची एक पिशवी याप्रमाणे किमान २ ते ३ पिशव्या बियाणे पेरले आहे.साहजिकच पीक जोमात येऊन बाजारभाव मिळाल्यास पैसेही चांगले होतील. मात्र पावसाने ताण दिल्याने सर्व शक्यतांवर पाणी पडले आहे.