शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:20 IST

कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर या महिन्यात नुकत्याच झालेल्या वि. स. खांडेकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देगीता भुर्के यांनी घडविले 'ययाती' कादंबरीचे एकपात्री दर्शन वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर पीएचडी केलेल्या सुनंदा वाघ यांचा सत्कार

पुणे : कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर या महिन्यात नुकत्याच झालेल्या वि. स. खांडेकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम शाम व गीता भुर्के यांनी सादर करून खांडेकरांचे साहित्य उलगडले. श्याम भुर्के म्हणाले, की खांडेकरांचे गद्य हे इतर कवींच्या पद्यापेक्षाही काव्यमय आहेत. त्यांच्या साहित्यात वाचकाचे नैराश्य नाहीसे करण्याचे सामर्थ्य आहे. नाटक, कादंबरी, कथासंग्रह, रूपककथा, लघुनिबंध, रसग्रहणग्रंथ, संपादन, चित्रपटकथा अशा प्रकारांत त्यांनी १३० ग्रंथ लिहिले. त्यांच्या ‘ययाती’ कादंबरीस मराठीतील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. सन १९४१ मध्ये सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. नाट्यसंमेलनाध्यक्ष झाले. ‘पद्मभूषण’ हा सन्मान त्यांना प्राप्त झाला.माणुसकी देहरूपाने दाखवायची असेल तर वि. स. खांडेकर या साहित्यिकाकडे पाहावे  लागेल. खांडेकरांचे साहित्य वाचणाऱ्याचे मन निर्मळ होते. तो काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त होतो, हे साहित्य आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन  शाम भुर्के यांनी केले.गीता भुर्के यांनी 'ययाती' कादंबरीचे एकपात्री दर्शन घडविले. त्यास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर पीएचडी केलेल्या सुनंदा वाघ यांचा या वेळी माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अलका घळसासी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे